शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील वादग्रस्त गावात पुन्हा तेलंगणाच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:07 IST

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील ‘त्या’ वादग्रस्त गावात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता पुन्हा त्याच गावात तेलंगणा राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रकिय्रा सुरू झाली असून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देकिती दिवस चालणार वाद? : महाराष्ट्र शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील ‘त्या’ वादग्रस्त गावात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता पुन्हा त्याच गावात तेलंगणा राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रकिय्रा सुरू झाली असून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील त्या वादग्रस्त १४ गावांत यापूर्वी अंतापूर आणि परमडोली या दोन ग्रामपंचायती होत्या. आता नव्याने मुकादमगुडा आणि भोलापठार या दोन ग्रामपंचायती झाल्या असून या चारही ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होणार आहे. या वादग्रस्त गावातील नागरिक दोन्ही राज्यात मतदान करतात. हीे त्या नागरिकांसाठी नवीन बाब नाही. तरीही या गावातील नागरिकांचा कल महाराष्ट्र शासनाच्या बाजुने आहे.विशेष म्हणजे, १७ जुलै १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला. तरीही तेलंगणा राज्य या गावांवर आपला अधिकार गाजवित आहे आणि महाराष्ट्र शासन केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. हे येथील नागरिकांचे दुर्देव. न्यायालयीन प्रकिया पुर्ण झाल्यानंतर तेलंगणा शासनाचा त्या गावावरील संपुर्ण अधिकार संपुष्टात आल्यावरसुद्धा केवळ मतदान यादीच्या भरोशावर तेलंगणा राज्य येथे निवडणुका घेत आहे. महाराष्ट्राच्या बाजुने तर संपुर्ण जनता आहे. येथील संपूर्ण नागरिक मराठी भाषिक आहेत. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. जमीन महाराष्ट्र शासनाचीच असून महसुली गावे म्हणून त्या १४ गावाची ओळख आहे. मग महाराष्ट्र शासन त्या तेलंगणा शासनाचा ताबा १४ गावांवरून का हटवत नाही. अजून किती दिवसानंतर येथील नागरिक दोन राज्याच्या कचाट्यातून बाहेर पडेल असा प्रश्न आता येथील सर्वसामान्य नागरिक विचारू लागला आहे. या वादग्रस्त १४ गावात महाराष्टÑ व तेलंगणा अशा दोन्ही राज्याच्या ग्रामपंचायती आहेत. आता तेलंगणा राज्य येथे ग्रामपंचायती निवडणुका घेत आहे. तरीही राज्य शासन गप्पच आहे.