शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे तहसीलदारांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

घनश्याम नवघडे नागभीड : निवडणूक जिंकलेल्या, पण जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांनी त्वरित जातवैधता प्रमाणपत्र त्वरित सादर करावेत, ...

घनश्याम नवघडे

नागभीड : निवडणूक जिंकलेल्या, पण जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांनी त्वरित जातवैधता प्रमाणपत्र त्वरित सादर करावेत, असे निर्देश येथील तहसीलदारांनी उमेदवारांना दिले आहेत. या आदेशाने येथील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या आरक्षित जागांवर निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांनी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत.

नागभीड तालुक्यात सहा महिन्यांपूर्वी ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. या ४३ ग्रामपंचायतींसाठी ३६३ सदस्यांची निवड करण्यात आली. यातील २१३ जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. आरक्षित जागेवर निवडणूक लढण्यासाठी जात प्रमाणपत्रच नाही, तर जातवैधता प्रमाणपत्रही आवश्यक करण्यात आले होते. मात्र, निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेक उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र असले, तरी जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने शासन पातळीवरून ऐन वेळी उमेदवारांना यात सवलत देण्यात होती. उमेदवाराने जातवैधता प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला असल्याचा पुरावा व वर्षभरात जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे हमीपत्र दिले, तरी त्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते.

नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी ३६३ सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली होती. यातील २१३ जागा विविध प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्या आहेत. यात अनुसूचित जातीसाठी ४४, अनुसूचित जमातीसाठी ७७ तर नागरिकांच्या मागास वर्गीय प्रवर्गासाठी १५० जागांचा समावेश होता. जातवैधता प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज आणि हमीपत्रावर अनेक उमेदवारांनी आरक्षित जागेवर निवडणूक जिंकली आहे. मात्र, यातील अनेकांनी अद्यापही हे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. काही उमेदवार तर पुढची निवडणूक येईपर्यंत हे प्रमाणपत्र सादर करीत नाही. अशा प्रकारामुळेच दीड वर्षापूर्वी तालुक्यातील काही सरपंच व सदस्यांना आपली पदे गमवावी लागली होती. हा प्रकार पुन्हा उद्धवू नये, यासाठी हे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.

बॉक्स

प्रमाणपत्र कोणाकडे असतात

ज्यांचे शिक्षण विज्ञान शाखेतून झाले आहे. जे सेवानिवृत्त झाले आहेत किंवा ज्यांनी यापूर्वी राखीव जागेतून निवडणूक जिंकलेली आहे. अशाच व्यक्तीकडे जात वैधता प्रमाणपत्र असते. बाकी व्यक्तींना निवडणूक लढण्यासाठी नव्यानेच जातवैधता प्रमाणपत्र काढावे लागते.