शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती चोरीत तहसीलदारांचा हात

By admin | Updated: November 24, 2014 22:55 IST

या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध रेती चोरीला येथील तहसीलदारांच्या प्रत्यक्ष हात असल्याचा आरोप भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. राजू गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

भद्रावती : या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध रेती चोरीला येथील तहसीलदारांच्या प्रत्यक्ष हात असल्याचा आरोप भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. राजू गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.३० सप्टेंबरला तालुक्यातील सर्व रेतीघाटांची लिज समाप्त झाली. त्यानंतर रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात रेती घाटावरुन रेतीचा उपसा करून अवैध वाहतुकीच्या माध्यमातून विक्री सुरू केली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील कचराळा, जेना, चालबर्डी रै. कोची, बरांज, मांगली, पिरर्ली, चंदनखेडा, पावना, घोटनिंबाळा, चिरादेवी, बोनथळा यासह अनेक रेती घाटावरुन रेतीची चोरी सुरू आहे. लहान व गरीब ट्रॅक्टर चालक व मालकांवर कारवाई करुन आपण ही अवैध रेती चोरी पकडत आहो, असा भास तहसीलदार सचिन कुमावत निर्माण करीत आहो, असा आरोप गैणवार यांनी निवेदनातून केला आहे. याउलट मोठे रेती तस्कर जेसीबी मशिनच्या साह्याने हायवा व टिप्पर या ट्रकच्या माध्यमातून राजरोसपणे रेतीचे चोरी करीत असून याकडे मात्र तहसीलदारांचे दुर्लक्ष आहे. मोठ्या रेती तस्कारात आणि तहसीलदारात ‘अर्थ’ पूर्ण करार झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी चंदनखेडा येथील रेतीघाटावरुन त्या मंडळातील तीन तलाठ्यांनी कारवाई केली असता त्यांच्यावर ट्रॅक्टर मालक आणि त्यांच्या मजुरांनी प्राणघातक हल्ला केला. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. परंतु तहसीलदारांनी या प्रकरणी विशेष आस्था दाखविली नसल्याचा आरोप विदर्भ पटवारी संघाचे वरोरा उपविभागाचे अध्यक्ष जे. टी. बलकी यांनी केला. याउलट नव्यानेच रुजू झालेले परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत फसके यांनी आपल्या कर्तव्यतत्परतेने रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न चालविला आहे. तहसीलदारांच्या संगनमताने या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध रेती चोरीला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आळा घालावा, यात लिप्त असलेल्या तहसीलदारांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी गैणवार यांनी निवेदनातून केली आहे. कारवाई न झाल्यास भाकपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री आणि इतरांना पाठविण्यात आल्या आहे. (शहर प्रतिनिधी)