शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

भंगार वेचणाऱ्या निराधारांना दिला तहसीलदाराने आधार

By admin | Updated: March 1, 2016 00:46 IST

राजुरा तालुक्यातील विरुर येथील मागील २५ वर्षांपासून भंगार वेचून जीवन जगणाऱ्या व विरुर रेल्वे स्थानकाजवळील ...

धर्मेश फुसाटे यांचे निर्देश : गरजुंना योजनेचा लाभ द्याविरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर येथील मागील २५ वर्षांपासून भंगार वेचून जीवन जगणाऱ्या व विरुर रेल्वे स्थानकाजवळील एका छोट्याशा झोपडीत वास्तव्य करून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन व्यक्तींना तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिला.संबंधित पटवारी किंवा ग्रामसेवकाने याकडे लक्ष न दिल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून ते वंचित रहात होते. मात्र राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी याकडे जातीने लक्ष देऊन त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिल्याने भंगार वेचून आयुष्य जगणाऱ्या त्या दोघांना आधार मिळाला आहे. राजुरा तालुक्यातील विरुर येथे मागील २५ वर्षांपासून विरुर रेल्वे स्थानकाजवळील एका छोट्याशा झोपडीत बुचय्या पोचम आत्राम (६७ वर्ष) व बब्बू तुराबमियॉ (६५ वर्ष) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तसेच भंगार वेचून आपला जीवनाचा गाडा कसबसा हाकत आहे. मागील २५ वर्षांपासून विरुर येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, बँकेचे पासबूक व इतर कागदपत्र आहेत. मात्र त्यांना शासनाचा कोणताच लाभ मिळत नव्हता. याकडे गावातील नागरिक किंवा शासकीय कर्मचारी लक्ष देत नव्हती. राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी विरुर येथे काही दिवसांपूर्वी दौरा केला. या दरम्यान यांचे लक्ष या दोघांवर गेले. त्यांची दयनीय अवस्था पाहून संजय गांधी योजनेचा लाभ देण्याकरीता स्वत: त्यासाठी लागणारे कागदपत्र गोळा केले. त्यानंतर प्रस्ताव तयार केला. केवळ दहा दिवसातच संबंधित प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांना दर महिन्याला आता मानधन मिळत असल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यातील एकाचा आंतरजातीय विवाह आहे. गरजू लाभार्थ्यांना कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित न ठेवता त्यांना रितसर शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा अशी सूचना यावेळी धर्मेश फुसाटे यांनी तलाठ्याला दिली. (वार्ताहर)