शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

तंत्रज्ञानामुळे पत्रकारिताही झाली हायटेक

By admin | Updated: January 6, 2017 01:04 IST

जगता कुठे काय चालले आहे, याची माहिती लोकांपर्यंत पोहचविणाचे साधन म्हणून वर्तमानपत्रांची सुरुवात झाली.

सोई-सुविधा वाढल्या : वाचकांची संख्याही वाढली वसंत खेडेकर  बल्लारपूर जगता कुठे काय चालले आहे, याची माहिती लोकांपर्यंत पोहचविणाचे साधन म्हणून वर्तमानपत्रांची सुरुवात झाली. राजे- रजवाडे यांच्या काळात गावात दवंडी पिटली जात असे. इग्रजांच्या काळातही ती पिटली जाई. या सोबतच वर्तमानपत्र काढून दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत नेण्याचे कामही त्यांनी केले. इंग्रजांनी वर्तमानपत्राची सुरुवात भारतात केली, असे म्हटले जाते. त्यानंतर भारतीय भाषांमध्ये वर्तमानपत्र निघू लागलेत. याबाबत बंगाली भाषा सर्वात पुढे राहिली. त्या पाठोपाठ हिंदी, सोबतच इतरही भाषांमध्ये वर्तमानपत्र प्रकाशित होऊ लागले. मराठी भाषेत पहिले वर्तमानपत्र स्व. बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे ६ जानेवारीला काढले. त्यामुळे ६ जानेवारीला मराठी मुलुखात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो. जांभेकर यांनी दर्पण मराठी सोबत इंग्रजीत ही काढले होते. इंग्रजी भाषा त्याकाळी फार कमी लोकांना कळायची. त्यामुळे, भारतीय भाषांमध्ये वर्तमानपत्र काढणे गरजेचे होते. परंतु इंग्रजांना भारतीय लोकांचा आवाज व समस्या या कळावेत, या उद्देशाने बरेचजण आपापल्या भाषेसोबत इंग्रजीतही वर्तमान पत्र काढायचे. त्यासाठी, बहुतेक पत्रकारांचा उद्देश लोकजागृती, लोकांच्या समस्यांना, प्रश्नांना वाचा फोडणे हे होते. पूर्वी, वर्तमानपत्रांची संख्या खूपच कमी होती. वाढत जाऊन ती या घडीला कितीतरी मोठी झाली आहे. इलेक्ट्रानिक मिडीया आल्यानंतरही मुद्रण प्रकारातील वर्तमानपत्र कमी झाले नाहीत. उलट त्यात सातत्याने वाढच होत आहे. पूर्वीची पत्रकारिता, वर्तमानपत्र, मुद्रण व बातम्या छापण्याचा आणि पत्रकाराने कार्यालयांकडे बातम्या पाठविण्याचा प्रकार यामध्ये बराच बदल झालेला आहे. आपण याबाबत नागपूर विभागापुरतेच बोलू! ५०-५५ वर्षापूर्वी, नागपूर विभागात प्रादेशिक वर्तमानपत्र मराठी तीन, हिंदी दोन, इंग्रजी दोन एवढीच निघायची! नागपूर, पूर्वी मध्यप्रदेशात असल्याने या भागात मराठी एवढाच हिंदी भाषेचा प्रभाव होता. त्यांनतर मुंबई प्रांत व आता महाराष्ट्रात असे राज्य झाले. आज, रात्री १० - ११ वाजताही शहरात व गावात मोठी घटना घडली की दुसऱ्या दिवशी, त्या घटनेची बातमी वर्तमानपत्रात फोटोसह वाचायला मिळते. त्याचे कारण, नवीन प्रसार तंत्रज्ञान. ५०-६० वर्षापूर्वी मात्र आज या क्षेत्रात जे बघतो व अनुभवतो त्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. आज घटना घडली की, त्याची बातमी बनवून नागपूरला तत्काळ पाठविण्याकरिता आजच्या एवढे सहज सोपे साधनच नव्हते. गावात फोनची संख्या मर्यादीत होती. नागपूरला कुणा गावावरुन फोनवर बोलायचे म्हणजे फोन एक्सचेंजवर नंबर बुक करा आणि फोन लागण्याकरिता आपला नंबर कधी लागतो, याची फोन जवळ बसून पाऊण एक तास वाट बघत बसा. नंबर आलाच, बोलणे सुरु झाले की फोन मध्येच कधी बंद होणार याचा भरोसा नसायचा. परत एक तास वाट बघत बसा. दुसरी सोय होती पोस्टातील टेलिप्रिंटरची! टेलिप्रिंटरने नागपूरला बातमी पाठविली जाई. त्याकरिता, टेलिप्रिंटर आपरेटरला, बातमी लवकर पाठवा अशी विनंती केली जाई. त्याने मानले तर ठीक! नाही तर- बोंबला! दुसरा मार्ग होता बसने हातोहाती बातम्याचा लिफाफा पाठविण्याचा. बस स्टँडवर जाऊन, नागपूरला कुणी ओळखीचा जातो का ते बघा, नागपूरच्या बसस्थानकावर वर्तमान पत्राच्या पेट्या असतात. त्यात लिफाफा टाकण्याची विनंती करा, खूपच अर्जंट असेल (जाहिरात वगैरे) तर त्याला अधिकचे पैसे देऊन थेट कार्यालयातच नेऊन द्या, असे नम्रतेने सांगा अशा कसरती कराव्या लागत. सभा संमेलन वा इतर रुटीन बातम्या असल्या की त्या पोस्टाने नागपूरला पाठविले जाई. फोटोबाबत बोलायलाच नको! फोटोग्रार फोटो आरामाने देई. नागपूर कार्यालयात ते पाठविले की, त्या फोटोचा लाकडी ब्लॉक बनविला जाई. त्यावर खर्च आणि प्रक्रियाही लांब! त्यामुळे फोटो फारच कमी येई. उदाहरणच द्यायचे झाल्यास तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद वा पंतप्रधान पं. नेहरु यांचे देश विदेशांमध्ये कोणते मोठे कार्यक्रम झाले की त्या बातमी सोबत त्यांचे ठरलेले पासपोर्ट आकाराचे फोटो येत. कार्यक्रमाचे विस्तृत फोटो बातमीच्या दोन तीन दिवसांनी येत असे. दळणवळणाची आजच्या एवढी रेलचेल नव्हती. त्यामुळे नागपूरची वर्तमानपत्र त्या दिवशी दुपारी २ वाजता नंतर वाचकांच्या हाती पडे! आता तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की पत्रकार घरबसल्या बातमी फोटोसह आपल्या कार्यालयात पाठवतो. फॅक्स आले,गेले. ई-मेल करीत दूर जाव ेलागत असे. आता मोबाईलवरच ई-मेल आले आहेत. अशी बदलत गेली पत्रकारिता आणि वर्तमानपत्रे. अधिकाधिक बातम्या प्रकाशित व्हाव्यात म्हणून मुख्य आवृत्ती सोबत जिल्हा आवृत्या निघू लागल्या आहेत. त्यामुळे लहान लहान गावांनाही बातम्यांमध्ये स्थान मिळू लागले आहे. हे खरे असले तरी दुसऱ्या जिल्ह्यमध्ये काय घडले, काय चालू आहे, जे जाणून घेण्यापासून वाचक दुरावला आहे.