शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
4
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
5
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
6
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
7
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
8
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
9
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
10
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
11
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
12
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
13
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
14
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
15
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
16
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
17
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
18
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
19
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
20
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?

अतिपावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST

शंकरपूर : निसर्ग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करीत आहे, हे समजून येत नाही. सतत येत असलेल्या पावसामुळे ...

शंकरपूर : निसर्ग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करीत आहे, हे समजून येत नाही. सतत येत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकातून अंकूर यायला लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता पाणी येत आहे.

शंकरपूर परिसरातील खैरी, साठगाव, कोलारी, हिवरा, अंबोली, चिंचाळा, आजगाव, पाचगाव आदी गावांत मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. निसर्गाने सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात साथ दिल्याने आणि सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी या वेळेस सोयाबीन पीक घेतलेले आहे. आता सोयाबीन पीक संपूर्णपणे वाळलेले असून आता ते कापणीवर आलेले आहे. परंतु मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने उभ्या सोयाबीन पिकामधूनच अंकुर फुटायला लागल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

बॉक्स

यंदा सोयाबीनचा पेराही वाढला

कृषी कार्यालय शंकरपूर अंतर्गत सन २०२० मध्ये १२६५ हेक्टर जमिनीवर सोयाबीन पिकांची लागवड करण्यात आली होती. यात वाढ होऊन या वर्षीच्या हंगामात १४७८ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली. आता हे सर्व पीक कापणीला आले आहे. परंतु मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकांची कापणी करण्यात आली नाही. त्यामुळे या पिकातून कोंब यायला लागले आहेत तर काही सोयाबीन पीक काळे पडत आहे. त्यामुळे या पिकाला पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी येत आहे.