शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

अतिपावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST

शंकरपूर : निसर्ग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करीत आहे, हे समजून येत नाही. सतत येत असलेल्या पावसामुळे ...

शंकरपूर : निसर्ग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करीत आहे, हे समजून येत नाही. सतत येत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकातून अंकूर यायला लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता पाणी येत आहे.

शंकरपूर परिसरातील खैरी, साठगाव, कोलारी, हिवरा, अंबोली, चिंचाळा, आजगाव, पाचगाव आदी गावांत मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. निसर्गाने सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात साथ दिल्याने आणि सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी या वेळेस सोयाबीन पीक घेतलेले आहे. आता सोयाबीन पीक संपूर्णपणे वाळलेले असून आता ते कापणीवर आलेले आहे. परंतु मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने उभ्या सोयाबीन पिकामधूनच अंकुर फुटायला लागल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

बॉक्स

यंदा सोयाबीनचा पेराही वाढला

कृषी कार्यालय शंकरपूर अंतर्गत सन २०२० मध्ये १२६५ हेक्टर जमिनीवर सोयाबीन पिकांची लागवड करण्यात आली होती. यात वाढ होऊन या वर्षीच्या हंगामात १४७८ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली. आता हे सर्व पीक कापणीला आले आहे. परंतु मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकांची कापणी करण्यात आली नाही. त्यामुळे या पिकातून कोंब यायला लागले आहेत तर काही सोयाबीन पीक काळे पडत आहे. त्यामुळे या पिकाला पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी येत आहे.