शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भूलथापा देऊन मताधिक्य मिळविणाऱ्या पक्षांना धडा शिकवा

By admin | Updated: August 5, 2014 23:42 IST

लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाद्वारे युवकांचे भाग्य बदलवू देशातील शेतकरी, कामगार, मजूरवर्ग व गृहिणींच्या समस्या जातीने सोडवून ‘अच्छे दिन’ आणण्याचे खोटे दावे करणाऱ्या

गोंडपिंंपरी/ब्रह्मपुरी : लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाद्वारे युवकांचे भाग्य बदलवू देशातील शेतकरी, कामगार, मजूरवर्ग व गृहिणींच्या समस्या जातीने सोडवून ‘अच्छे दिन’ आणण्याचे खोटे दावे करणाऱ्या भाजप व युती पक्षाने देशातील जनतेचा भ्रमनिराश केला असून अशा खोट्या भुलथापाा देणाऱ्या पक्षांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. ते गोंडपिंपरी येथील कन्यका सभागृहात रायुकाँ युवा संवाद अभियानांतर्गत आयोजित युवक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. याप्रसंगी राकाँ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुराधा जोशी, जिल्हा परिषद कृषी सभापती अरुण निमजे, युवक प्रदेश उपाध्यक्ष वर्र्षा श्यामकुळे, रायुकाँ जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, माजी आमदार सुदर्शन निमकर, मुनाज शेख, रायुकाँ जिल्हा उपाध्यक्ष ताजणे, राजीव कक्कड, चेतन राजकारणे, तालुका अध्यक्ष सुनील झाडे, माधुरी येलेकर, रायुकाँ तालुका अध्यक्ष सुुनील फुकट, विद्याार्थी अध्यक्ष सुरज माडूरवार, नितेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मतदार संघातील समस्या मांडल्या. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ब्रह्मपुरीतही मेळावा मंगळवारी दुपारी युवा संसद अभियानांतर्गत ब्रह्मपुरीमध्येही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य होते. आमदार उमेश पाटील म्हणाले, लोकसभेत देशातील जनतेला केवळ स्वप्ने दाखवून सत्ता काबीज केली. लोकांची शुद्ध फसवणूक भाजपाने केली आहे. महाराष्ट्रात ते पुन्हा सत्तेची स्वप्न पाहत आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता याची स्वप्ने उधळून लावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विधानसभेची निवडणूक तयारीपूर्वी युवकांचे संवाद अभियान कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उमेश पाटील यांनी मिडियानी केलेला प्रचार, सोशल मिडियाचा वापर, मोबाईल संदेशचा उपयोग करुन जनतेला भूलथापा देऊन भाजपाने सत्ता काबीज केल्याचा आरोप भाषणातून केला. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, मोरेश्वर टेंमुर्डे, राजेंद्र वैद्य आदींनी मनोगत व्यक्त केले. संचालन दामोधर मिसार, उद्धवराव शिंगाडे, अरुण निमजे, गाडेवार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)