शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

यंदा चाखता येणार नाही चंद्रपूरच्या डोंगरगावच्या आंब्याची लज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:38 IST

नागभीड शेजारी असलेले डोंगरगाव आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंब्यांची नागभीडकरांना उन्हाळ्यात भुरळ पडते, मात्र यावर्षी येथील आंब्यांच्या झाडांना फळधारणाच झाली नसल्याने नागभीडकरांना डोंगरगावच्या आंब्यांच्या लज्जतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्दे१५० शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे यावर्षी आंब्याच्या झाडांना फळधारणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हावर मात करण्यासाठी नागरिक विविध साधनांचा वापर करतात. शरीराला गारवा देणाऱ्या साधनांत आंब्याचाही समावेश आहे. नागभीड शेजारी असलेले डोंगरगाव आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंब्यांची नागभीडकरांना उन्हाळ्यात भुरळ पडते, मात्र यावर्षी येथील आंब्यांच्या झाडांना फळधारणाच झाली नसल्याने नागभीडकरांना डोंगरगावच्या आंब्यांच्या लज्जतीपासून वंचित राहावे लागणार आहे.आंब्याच्या कैऱ्या असो की, परिपक्व झालेले आंबे, पिकलेले आंबे, प्रत्येकालाच ते हवेहवेसे वाटतात. आंबे जरी हवेहवेसे वाटत असले तरी, झाड लावण्याची सवड कोणाजवळच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात हा रानमेवा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र डोंगरगावच्या काही शेतकऱ्यांनी या आंब्याला व्यावहारिक रूप देऊन या झाडांचे संगोपन केले. आंब्याचे गांव अशी डोगरगावची आता ओळख निर्माण झाली आहे.डोंगरगांव येथील उमेश दिनकर पाथोडे, शिवदास रामदास पाथोडे, अशोक लहानू पाथोड, अजय हिरामन कोसे यांनी आपल्या शेतात रत्ना, दशेरी, लंगडा, केशर या प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांकडे १५० च्या आसपास आंब्याची झाडे आहेत. या शेतकºयांनी उत्पादित केलेले आंबे एवढे दर्जेदार असतात की , डोंगरगावचे आंबे बाजारात केव्हा येतात, याची उत्सुकता येथील नागरिकांना असते.आंब्याचे गाव म्हणून ओळख

उन्हाळ्यातील काहिलीला काबूत ठेवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून आंब्याकडे पाहिले जाते. डोंगरगाव हे गाव नागभीडपासून पाच किमी अंतरावर आहे. गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर आहे. धान पिकासोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात डोंगरगाव दर्जेदार आंब्यांमुळे चर्चेत आले आहे. एवढेच नाही तर हे गाव आंब्याचे गाव म्हणून ओळखले जाते.

ग्राहक गावात जाऊन करतात खरेदीआंबा पाडाला आला की, या आंबा उत्पादकांचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते ग्राहक फोनवरूनच आपल्याला किती आणि केव्हा आंबे लागतील याची सुचना देतात. त्याचबरोबर उर्वरित आंबे या उत्पादकांनी नुसते रस्त्याने फिरविले तरी हातोहात विक्री होतात.बाजारातील रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविलेल्या आंब्यांपेक्षा डोंगरगावचे आंबे केव्हाही बरे, अशा आंबाशौकिनांच्या प्रतिक्रिया आहे. अनेकजण तर डोंगरगावला जाऊन आंबे खरेदी करतात.

टॅग्स :Mangoआंबा