शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:27 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या काळात सर्वांत जास्त लक्ष महिला व बालकांवर देणे गरजेचे आहे. कोविडमुळे दोन्ही पालक दगावले ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या काळात सर्वांत जास्त लक्ष महिला व बालकांवर देणे गरजेचे आहे. कोविडमुळे दोन्ही पालक दगावले असल्यास अशा बालकांची नोंद करून घेत त्याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

महिला व बालकांसंबंधीचे विषय, तसेच त्यांच्याशी संबंधित शासकीय संस्था याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्याचा आढावा घेतला.

यावेळी सदर बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संग्राम शिंदे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेकांचे पालकत्व हरवले आहे. आई- वडील दोघांचेही निधन झाल्याने मुले अनाथ झाली आहेत. बालकांच्या जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे. या मुलांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी यासारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. बाल न्याय समितीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबंधी कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती घ्यावी त्याबाबत आढावा घेण्यात यावा, अशा सूचना महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

बैठकीमध्ये मुलांचे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून, तर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील, तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत. जिल्हाधिकारी हे टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील, असेही त्या म्हणाल्या.

बॉक्स

दर पंधरवड्यात होणार बैठक

दर पंधरवाड्यातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करून कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बालगृहे, निरीक्षण गृहातील प्रवेशित व तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा, तसेच टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही ना. ठाकूर यांनी दिल्या.