शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

उद्दिष्ट २०० कोटींचे, वितरण फक्त नऊ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:30 IST

धान व कापूस, कडधान्य उत्पादक तालुक्यातील शेतकरी नवनवीन पीकपद्धतीचा अवलंब करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, लागवडीच्या नवीन पद्धती, दर्जेदार ...

धान व कापूस, कडधान्य उत्पादक तालुक्यातील शेतकरी नवनवीन पीकपद्धतीचा अवलंब करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, लागवडीच्या नवीन पद्धती, दर्जेदार बियाणे आणि सिंचनाच्या सुविधांसाठी लागवडीचा खर्च दरवर्षी वाढत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेतल्याशिवाय पयार्यच उरत नाही. त्यामुळेच खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही पीक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. कोरोनाचे सावट असतानाही जिल्ह्याला २०० कोटी रब्बी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले; परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास तकलादू कारणे पुढे केली.

राष्ट्रीयीकृत बँकांची नकारघंटा

साथरोग प्रतिबंधक कायद्यामुळे कर्ज मेळावे आयोजित करण्यास बंधने आली, हे खरे आहे. परंतु, नकारात्मक भूमिकेमुळे अर्ज सादर केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही रब्बी कर्ज मिळू शकले नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याचाच परिणाम म्हणून २०० कोटी उद्दिष्टांच्या तुलनेत आतापर्यंत केवळ नऊ टक्के कर्ज वितरण होऊ शकले.

गतवर्षी १५ कोटींहून जास्त कर्ज वितरण

गतवर्षी रब्बी हंगामासाठी १५ कोटींचे कर्ज वितरण झाले होते. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना लागवड खर्चासाठी सावकारांच्या दारात जावे लागले नाही. खरीप हंगामातही पीक कर्जासाठी आडकाठी न आल्याने रब्बी हंगाम व्यवस्थित पूर्ण होऊ शकला. यंदाचे चित्र उलट दिसून आले.

उधार-उसणे करून भागवला लागवड खर्च

चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, भद्रावती, बल्लारपूर, कोरपना तालुक्यात रब्बी डाळवर्गीय पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. पण, ऐन लागवडीच्या कालावधीत पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे उधार-उसणे करून लागवडीचा खर्च भागवला, अशी माहिती आठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली.