शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उद्दिष्ट २०० कोटींचे, वितरण फक्त नऊ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:30 IST

धान व कापूस, कडधान्य उत्पादक तालुक्यातील शेतकरी नवनवीन पीकपद्धतीचा अवलंब करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, लागवडीच्या नवीन पद्धती, दर्जेदार ...

धान व कापूस, कडधान्य उत्पादक तालुक्यातील शेतकरी नवनवीन पीकपद्धतीचा अवलंब करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, लागवडीच्या नवीन पद्धती, दर्जेदार बियाणे आणि सिंचनाच्या सुविधांसाठी लागवडीचा खर्च दरवर्षी वाढत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेतल्याशिवाय पयार्यच उरत नाही. त्यामुळेच खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही पीक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. कोरोनाचे सावट असतानाही जिल्ह्याला २०० कोटी रब्बी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले; परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास तकलादू कारणे पुढे केली.

राष्ट्रीयीकृत बँकांची नकारघंटा

साथरोग प्रतिबंधक कायद्यामुळे कर्ज मेळावे आयोजित करण्यास बंधने आली, हे खरे आहे. परंतु, नकारात्मक भूमिकेमुळे अर्ज सादर केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही रब्बी कर्ज मिळू शकले नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याचाच परिणाम म्हणून २०० कोटी उद्दिष्टांच्या तुलनेत आतापर्यंत केवळ नऊ टक्के कर्ज वितरण होऊ शकले.

गतवर्षी १५ कोटींहून जास्त कर्ज वितरण

गतवर्षी रब्बी हंगामासाठी १५ कोटींचे कर्ज वितरण झाले होते. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना लागवड खर्चासाठी सावकारांच्या दारात जावे लागले नाही. खरीप हंगामातही पीक कर्जासाठी आडकाठी न आल्याने रब्बी हंगाम व्यवस्थित पूर्ण होऊ शकला. यंदाचे चित्र उलट दिसून आले.

उधार-उसणे करून भागवला लागवड खर्च

चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, भद्रावती, बल्लारपूर, कोरपना तालुक्यात रब्बी डाळवर्गीय पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. पण, ऐन लागवडीच्या कालावधीत पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे उधार-उसणे करून लागवडीचा खर्च भागवला, अशी माहिती आठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली.