शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

तंटामुक्त गाव समित्यांची पुरस्कारासाठी धडपड

By admin | Updated: January 4, 2015 23:08 IST

शासनाने सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती प्रत्येक गावात स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

राजकीय हस्तक्षेप : पुरस्कारप्राप्त गावामध्येच तंटे कायमनांदाफाटा : शासनाने सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती प्रत्येक गावात स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यानंतर या समित्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व कार्याची गती वाढवून विकास साधण्यासाठी शासनाने तंटामुक्त गाव समित्यांना पुरस्कार योजना सुरु केली आहे. यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर १० लाखापर्यंतची रक्कम या समित्यांना देण्यात येते. मात्र यातील अनेक तंटामुक्त समित्यांचे तंटे केवळ कागदावरच असून गावातील तंटे कायमच आहे. कोरपना तालुक्यातील २२ ते २३ गावांना तंटामुक्त समितीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये काही ग्रामपंचायतींनी पुरस्कारापुती गावात समिती गठित करून शांतता व सुव्यवस्था असल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. तर काही ठिकाणी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या तंट्याचा निपटारा झालेला नसल्याची ओरडच गावकरी करीत आहे. गावातील दारूबंदी, जुगारबंदी, पांदण रस्ते, गावातील तंटे गावातच सोडविण्याची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांना न्यायालयीन जाचक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा शासनाचा योजनेमागचा उद्देश आहे. अनेक गावांमध्ये पोळ्याच्या सणाला तोरण बांधण्यावरून होणारे तंटेही या समितीने सोडविण्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल १०५ गावे तंटामुक्त झाल्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. सोबतच राज्यातील विविध तंटामुक्त समित्यांसाठी पुरस्काराची रक्कम म्हणून दोन कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयाचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून गावाचा विकास साधणे हा द्देश आहे. परंतु अनेक गावातील समित्या तंटे सोडविण्यास समित्या असफल ठरत आहे. बऱ्याच गावात जमिनीसंबंधी व पांदण रस्त्यासंबंधी प्रलंबित प्रकरणे तंटामुक्त समितीपुढे ठेवण्यात आलेले आहे. मात्र तंटामुक्त समित्यांकडून नागरिकांचे समाधान होत नसल्याने असे तंटे पुन्हा न्यायालयात जात आहे. शासनाने कोट्यवधी रुपये या समित्यांना पुरस्काराच्या रूपाने दिलेले आहे. मात्र पुरस्काराची रक्कम पाहता समिती पदाधिकाऱ्यांमध्ये तंटे निर्माण होत असल्याचेही काही गावामध्ये चित्र आहे. तर कुठे अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होत आहे. (वार्ताहर)