शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव समित्यांची पुरस्कारासाठी धडपड

By admin | Updated: January 4, 2015 23:08 IST

शासनाने सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती प्रत्येक गावात स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

राजकीय हस्तक्षेप : पुरस्कारप्राप्त गावामध्येच तंटे कायमनांदाफाटा : शासनाने सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती प्रत्येक गावात स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यानंतर या समित्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व कार्याची गती वाढवून विकास साधण्यासाठी शासनाने तंटामुक्त गाव समित्यांना पुरस्कार योजना सुरु केली आहे. यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर १० लाखापर्यंतची रक्कम या समित्यांना देण्यात येते. मात्र यातील अनेक तंटामुक्त समित्यांचे तंटे केवळ कागदावरच असून गावातील तंटे कायमच आहे. कोरपना तालुक्यातील २२ ते २३ गावांना तंटामुक्त समितीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये काही ग्रामपंचायतींनी पुरस्कारापुती गावात समिती गठित करून शांतता व सुव्यवस्था असल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. तर काही ठिकाणी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या तंट्याचा निपटारा झालेला नसल्याची ओरडच गावकरी करीत आहे. गावातील दारूबंदी, जुगारबंदी, पांदण रस्ते, गावातील तंटे गावातच सोडविण्याची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांना न्यायालयीन जाचक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा शासनाचा योजनेमागचा उद्देश आहे. अनेक गावांमध्ये पोळ्याच्या सणाला तोरण बांधण्यावरून होणारे तंटेही या समितीने सोडविण्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल १०५ गावे तंटामुक्त झाल्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. सोबतच राज्यातील विविध तंटामुक्त समित्यांसाठी पुरस्काराची रक्कम म्हणून दोन कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयाचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून गावाचा विकास साधणे हा द्देश आहे. परंतु अनेक गावातील समित्या तंटे सोडविण्यास समित्या असफल ठरत आहे. बऱ्याच गावात जमिनीसंबंधी व पांदण रस्त्यासंबंधी प्रलंबित प्रकरणे तंटामुक्त समितीपुढे ठेवण्यात आलेले आहे. मात्र तंटामुक्त समित्यांकडून नागरिकांचे समाधान होत नसल्याने असे तंटे पुन्हा न्यायालयात जात आहे. शासनाने कोट्यवधी रुपये या समित्यांना पुरस्काराच्या रूपाने दिलेले आहे. मात्र पुरस्काराची रक्कम पाहता समिती पदाधिकाऱ्यांमध्ये तंटे निर्माण होत असल्याचेही काही गावामध्ये चित्र आहे. तर कुठे अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होत आहे. (वार्ताहर)