शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी विभागाला १९ रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही: शेतकऱ्यांना शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंतर्गत कृषी कार्यालयाची निर्मिती केली. मात्र, ३२ पैकी १९ पदे रिक्त असल्याने कृषी योजनांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.शेतकºयांच्या हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय महत्त्वाचे मानले जाते. पण ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये नाराजी : रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही: शेतकऱ्यांना शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंतर्गत कृषी कार्यालयाची निर्मिती केली. मात्र, ३२ पैकी १९ पदे रिक्त असल्याने कृषी योजनांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.शेतकºयांच्या हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय महत्त्वाचे मानले जाते. पण शासनाने पद भरतीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील विविध सेवा कागदावरच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कार्यालयाचे रिक्त पदाचे ग्रहण अद्याप सुटले नाही. कार्यालयात ३२ विविध पदे मंजूर असूनही १९ पदे रिक्त आहेत. शासनाच्या या उदासिन धोरणांमुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाले. नाही. तर दुसरीकडे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेता यावा, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे, याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून मिळते. सदर कार्यालय राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत येते. या कार्यालयाचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मात्र सिंदेवाही तालुका कृषी अधिकारी कार्यालय सध्यातरी अपवाद ठरले आहे. कार्यालयात तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कषी सहाय्यक, वरीष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अनुरेखक शिपाई असे एकूण १९ पदे रिक्त असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.कृषी योजनांचा लाभ घेण्यास अडचणीसिंदेवाही तालुका कार्यालयात तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कषी सहाय्यक, वरीष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अनुरेखक शिपाई अशी एकूण ३२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी १९ पदे रिक्त आहेत. मागील अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त असूनही जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना कागदावरच राहिल्या आहेत, असा आरोप शेतकरी करीत आहेत. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात बियाणे व आधुनिक कृषी अवजारांचा तुटवडा निर्माण झाला होता. बरेच शेतकरी आता पारंपरिक पिके टाळून आधुनिकतेकडे वळले आहेत. अशा शेतकºयांना कृषी तज्ज्ञांकडून तातडीने मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. परंतु, रिक्त पदांमुळे प्रशासकीय गतिमानता रखडल्याचे दिसून येते.