शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

प्रतिभावंतांनी वर्तमानातील ज्वलंत वास्तव मांडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:27 IST

चंद्रपूर : कविता, कथा, कादंबरी, नाटक व लेखनाचे विविध अनुबंध समाज जागृतीची प्रभावी माध्यमे आहेत. प्रतिभावंतांनी आपले जीवनानुभव अधिकाधिक ...

चंद्रपूर : कविता, कथा, कादंबरी, नाटक व लेखनाचे विविध अनुबंध समाज जागृतीची प्रभावी माध्यमे आहेत. प्रतिभावंतांनी आपले जीवनानुभव अधिकाधिक समृद्ध करून वर्तमानातील वास्तव मांडावे. कवी प्रब्रह्मानंद मडावी हे ‘बफरझोन’ काव्यसंग्रहातून ज्वलंत वास्तव मांडण्यास यशस्वी ठरले, असे प्रतिपादन मूलच्या नगराध्यक्ष व लेखिका प्राचार्य रत्नमाला भोयर यांनी केले. मूल येथील कन्नमवार सभागृहात शुक्रवारी ‘बफरझोन’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक दशरथ मडावी तर प्रमुख पाहुणे तहसीलदार रवींद्र होळी, कार्यकारी अभियंता ईश्वर आत्राम, जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, वरिष्ठ सहायक वैज्ञानिक देवानंद उईके, डॉ. वामन शेळमाके, प्रा. संदीप गायकवाड, सिनेट सदस्य सुनील शेरकी, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, प्रा. विठ्ठल आत्राम व अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा कोषागार अधिकारी पेंदाम यांनी काव्यसंग्रहाच्या सामर्थ्यस्थळांवर भाष्य केले. आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांना उजागर करून कवीने समाज परिवर्तनाचा संदेश दिल्याचे सांगितले. डॉ. शेळमाके, प्रा. लोनबेले, शेरकी यांनीही आदिवासी साहित्यात प्रब्रह्मानंद मडावी यांचा दुसरा काव्यसंग्रह दखलपात्र असल्याचे सांगितले. प्रा. गायकवाड यांनी ‘बफरझोन’ शोषणाचे प्रतीक असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष मडावी यांनी ‘बफरझोन’ काव्यसंग्रहाची वैशिष्ट्ये अधोरेखित करून एकूणच आदिवासी समाजाची स्थिती व गती, परिवर्तनाची अपरिहार्यता आदी पैलुंवर प्रकाश टाकला. कवी मडावी यांनी लेखनामागील भूमिका विशद केली. कोविड काळात नि:शुल्क रूग्णसेवा करणारे डॉ. प्रवीण येरमे व डॉ. शारदा येरमे तसेच प्रसिद्ध चित्रकार भारत सलाम यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांनी सत्कार केला. स्वागतगीत राजेश संगेल, चिदानंद सिडाम, अरविंद मसराम यांनी सादर केले. संचालन प्रा. महेश गेडाम तर प्रास्ताविक प्रा. विठ्ठल आत्राम यांनी केले. अरविंद मेश्राम यांनी आभार मानले. आयोजनासाठी राजू बन्सोड, लक्ष्मण सोयाम, यश मडावी, दिनेश करकाडे, भय्याजी उईके व उलगुलान साहित्य मंचाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.