शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तेलीयाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:37 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण अशा तेलीया जलाशयाच्या नयनरम्य जंगलाला आग लागून ४.५ किमी क्षेत्राची आगीत जळून राख झाली.

वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात : वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरजदुर्गापूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण अशा तेलीया जलाशयाच्या नयनरम्य जंगलाला आग लागून ४.५ किमी क्षेत्राची आगीत जळून राख झाली. बुधवारी अकस्मात लागलेल्या या आगीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे. कोर झोनमध्ये आग लागल्याने वाघासह अन्य सरपटणाऱ्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ६२५ चौ.किमीच्या संरक्षित क्षेत्रात कोर झोनचा दर्जा आहे. याच्या मध्यभागी तेलीयाचे जलाशय आहे. उन्हाळ्यात ताडोबातील बहुतेक नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडतात. ताडोबा जलाशयाव्यतिरिक्त केवळ तेलीया जलाशयात मुबलक पाण्याचा साठा असतो. मुबलक पाणी व हिरव्यागार असलेल्या या जलाशयाच्या आसपास वाघासह सारेच वन्यजीव आश्रयास असतात. अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महत्वाच्या ठिकाणी गुरुवारी (२७) अकस्मात भिषण आग लागली. तीव्र गतीने जोरदार वाऱ्याच्या दिशेने या आगीचा सर्वत्र भडका उडत होता. बॉम्बचा स्फोट होऊन भडका उडतो, त्याप्रमाणे या आगीचे रौद्ररुप होते. काही वेळातच या आगीने तेलीया जलाशयासभोवतालचे ४.५ किमीचे क्षेत्र कवेत घेतले. जैवविविधतेने संपन्न अशा वन्यजीवांच्या आश्रयस्थानाची काही वेळातच राखरांगोळी झाली. सध्या सूर्य आग ओकत आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात वन्यप्राणी तेलीया जलाशयाच्या आश्रयात राहतात. मात्र या परिसरालाच आग लागल्याने वाघासह अन्य वन्यजीव प्रभावित झाले आहे. तृणभक्षी वन्यजीवांचा चारा, पक्ष्यांची पिल्ले, अंडी, घरटे, सरपटणारे प्राणी किटक फूलपाखरे तसेच विविध वनस्पती बियाणे भस्मसात झाले. तेलीया जलाशयाच्या या ४.५ किमीच्या राऊंडमध्ये एरवी पर्यटकांना वाघासह सरपटणाऱ्या वन्यजीवांचे हमखास दर्शन होत होते. मात्र आता तेथे केवळ जळालेली वृक्ष व राखेचे दर्शन होत आहे. यामुळे पर्यटकांचाही भ्रमनिराश होत आहेत.मानवनिर्मित या आगीमुळे वनाचे वैभव असलेल्या वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. व्याघ्र संरक्षण व संवर्धन करण्याकरिता वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात जंगलाला ठिकठिकाणी आगी लागतच आहेत. यातच ताडोबाच्या कोर झोनमध्ये आग लागणे, हे वन्यजीवांच्या अस्तित्वाकरिता एक धोक्याची घंटा आहे. याकरिता वनविभागाला ठोस पावले उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)