शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

त्या तलाठी कार्यालयाला अजूनही इमारतीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST

आशिष खाडे पळसगाव : कोणतेही गाव म्हटले की, गावात तलाठी कार्यालय हे असतेच. प्रत्येक गावात सजाकरिता स्थायी इमारत आहे. ...

आशिष खाडे

पळसगाव : कोणतेही गाव म्हटले की, गावात तलाठी कार्यालय हे असतेच. प्रत्येक गावात सजाकरिता स्थायी इमारत आहे. तलाठी कार्यालयात शेतीसंबंधित कागदपत्रे जसे सात बारा, आठ- अ, नकाशा, उत्पनाचा दाखला, गावाची शिव, शेतातील नकाशा व इतर कागदपत्रांसाठी गावात तलाठी कार्यालय असते; परंतु बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे तलाठी कार्यालय असून, अजूनही ते इमारतीच्या प्रतीक्षेतच आहे.

स्थायी इमारतीअभावी या कार्यालयाची गावात इकडून तिकडे, तिकडून इकडे, अशी भटकंती सुरू आहे. भाडेतत्त्वावर किरायाच्या छोट्या खोलीमध्ये तलाठी कार्यालयाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकरिता अडथळा निर्माण होत आहे. पळसगाव येथील तलाठी कार्यालय हे फक्त पळसगाव या एका गावापुरते मर्यादित नसून या एका सजावर पळसगाव, किन्ही, कवडजई, इटोली, मानोरा, आसेगाव, गिलबिली, भडकाम ही गावेदेखील अवलंबून आहेत. या गावांतील गावकऱ्यांनाही शेतीसंबंधी पूर्ण दस्तऐवज याच कार्यालयात मिळतात. त्यामुळे बाहेरगावांहून येणाऱ्या शेतकऱ्याला या बाबीचा नाहक त्रास होतो, तसेच एवढ्या गावाची कागदपत्रे असलेले कार्यालय इमारतीअभावी भटकंती करीत आहे. त्यामुळे या सजाकरिता एक सुसज्ज इमारत असावी. जेणेकरून एक स्थायी व कायमस्वरूपी ठिकाण प्राप्त होईल. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तलाठी कार्यालयासाठी नवी इमारत बांधावी, अशी मागणी संबंधित शेतकरी व नागरिकांची आहे.