शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

२० लाख ३९ हजार रूपये खर्चूनही तलाव कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:52 IST

राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे २० लाख ३९ हजारांचा निधी खर्च करून तलाव बांधण्यात आला. परंतु नियोजनाचा अभाव व निकृष्ठ कामामुळे सहा वर्षे लोटूनही तलाव कोरडा असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : सहा वर्षांपासून पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे २० लाख ३९ हजारांचा निधी खर्च करून तलाव बांधण्यात आला. परंतु नियोजनाचा अभाव व निकृष्ठ कामामुळे सहा वर्षे लोटूनही तलाव कोरडा असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.जैतापूर येथील नागरिकांना दरवर्षी जलसंकटाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तलावाकरिता जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाने २० लाख ३९ हजार रूपयांचा निधी मंजूर केला. निविदा काढल्यानंतर मोठा गाजावाजा करून नोव्हेंबर २०१३ रोजी भूमीपूजन पार पडले. हे काम लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला तलावाचे काही काम झाले. मात्र ते निकृष्ट दर्जाचे केल्याने पहिल्याच पावसाळ्यात तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. त्यामुळे तलावातील पाणी वाहून गेले. त्यामुळे नागरिकांनी कंत्राटदार व तत्कालीन अभियंत्याची चंद्रपुरातील मुख्य अभियंत्याकडे तक्रार केली. त्यानंतर काम सुरू केले मात्र ते अद्याप अर्धवट आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा ठपका ठेवून कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले.अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटकासंबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे तलावाचे बांधकाम जैसे थे आहे. परिणामी जैतापुरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटले. नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. गावात केवळ ४ हातपंप आहेत. महिलांना पाण्यासाठी रात्री जागरण करावे लागत आहे.