शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

महापुरुषांचे विचार अंमलात आणा

By admin | Updated: November 17, 2016 01:52 IST

सामाजिक कार्यकर्त्यांनी फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांचा अमल करावा. आज प्रतिगामी विचारांना उधाण आले आहे.

मोरेश्वर टेमुर्डे : डी.के. आरीकर यांचा नागरी सत्कारचंद्रपूर : सामाजिक कार्यकर्त्यांनी फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांचा अमल करावा. आज प्रतिगामी विचारांना उधाण आले आहे. त्यामुळे त्याचा प्रखर विरोध करणारे आणि फुले- शाहु आंबेडकरांच्या विचारांवर प्रखर निष्ठा असणाऱ्या डी.के.आरीकर सारख्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आणि महत्त्व आहे. म्हणूनच त्यांचा नागरी सत्कार होत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केले. ते येथे मंगळवारी आयोजित डी.के. आरीकर यांच्या षष्टब्दीपूर्ती सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. त्यांनी आरीकर यांना शुभेच्छा देवून कार्यकर्त्यांना आरीकर यांच्यापासून प्रेरणा घेवून समाजकार्य करण्याचे आवाहन केले.तत्पूर्वी डी.के. आरीकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रंजना आरीकर यांचा अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे आणि प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि मानवस्त्र देवून सत्कार करण्यात आला. डी.के. आरीकर गौरव विशेषांकाचे प्रकाशनसुद्धा करण्यात आले. सत्कार समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यीक प्रा. ज्ञानेश वाकुडकर उपस्थित होते.याप्रसंगी किशोर पोतनवार, प्रा. बळवंत भोयर, अ‍ॅड. भगवान पाटील, हिराचंद बोरकुटे, राजेंद्र वैद्य, वैदेही रोहणकर यांनीही आपले विचार मांडले. डी.के. आरीकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपण फुले- शाहु- आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असून त्यांच्या विचारांपासून आपल्याला ताकद मिळते. त्यामुळे आपण निर्भयपणे समाजकार्य, पत्रकारिता करीत आलो आहे, असे सांगितले.यावेळी मंचार प्रसिद्धी साहित्यीक ना.गो. थुटे, सुभाष गौर, तुकाराम पवार, प्रदीप वादाफळे, नीळकंठ भोयर, कुुक्कू साहनी, विनायक शिवणकर, खैरे कुणबी समाजाचे अध्यक्ष गुणेश्वर आरीकर, पांडूरंग ठाकरे, अनिल वाघमारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)