शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्या -गिरीश गभणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST

‘पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी विशेष बातचीत केली. यावेळी डॉ. गभणे म्हणाले, पावसाळ्यात दूषित पाणी, डास, ...

‘पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी विशेष बातचीत केली. यावेळी डॉ. गभणे म्हणाले, पावसाळ्यात दूषित पाणी, डास, हवेतील आर्द्रता यामुळे जनावरांमधील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. या बाबींमुळे जिवाणूजन्य, विषाणूजन्य व कीटकजन्य आजार पसरतात. परिणामी जनावरांना घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार, तिवा यासारखे विविध आजार उद्भवतात. घटसर्प हा अतिशय घातक व जीवघेणा आजार प्रामुख्याने म्हशींमध्ये आढळतो. एकटांग्या हा आजार प्रामुख्याने एक ते दीड वर्ष वयोगटातील वासरांमध्ये आढळतो, तर आंत्रविषार हा आजार शेळ्या व मेंढ्यांमध्ये आढळतो.

पावसाळ्यापूर्वी, तसेच पावसाळ्यात जनावरांना जंत निर्मूलन करून घेणे आवश्यक आहे. जंतनाशक औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत. जनावरांच्या शरीरावरील जंतांचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताचे प्रमाण वाढून शरीरावरील ताण कमी होतो व जनावरे आजारांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते, असे गिरीश गभणे यांनी सांगितले.

यासोबतच पशुपालकांनी जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. म्हशींना घटसर्पाची, एक दीड वर्षाच्या गायी, म्हशीच्या वासरांना एकटांग्याची व शेळ्या-मेंढ्यांना आंत्रविषाराची लस टोचून घ्यावी. या सर्व लसी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय जनावरांना स्वच्छ पाणी पाजावे. गोठ्याची स्वच्छता ठेवावी, गोठ्याच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, बुरशी लागलेली व काळपट तण खायला घालू नये, अधिक डास असल्यास गोठ्यात पंखा लावावा. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने गावागावात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरांमध्ये पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डाॅ. गभणे यांनी यावेळी केले.