शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्या -गिरीश गभणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST

‘पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी विशेष बातचीत केली. यावेळी डॉ. गभणे म्हणाले, पावसाळ्यात दूषित पाणी, डास, ...

‘पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी विशेष बातचीत केली. यावेळी डॉ. गभणे म्हणाले, पावसाळ्यात दूषित पाणी, डास, हवेतील आर्द्रता यामुळे जनावरांमधील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. या बाबींमुळे जिवाणूजन्य, विषाणूजन्य व कीटकजन्य आजार पसरतात. परिणामी जनावरांना घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार, तिवा यासारखे विविध आजार उद्भवतात. घटसर्प हा अतिशय घातक व जीवघेणा आजार प्रामुख्याने म्हशींमध्ये आढळतो. एकटांग्या हा आजार प्रामुख्याने एक ते दीड वर्ष वयोगटातील वासरांमध्ये आढळतो, तर आंत्रविषार हा आजार शेळ्या व मेंढ्यांमध्ये आढळतो.

पावसाळ्यापूर्वी, तसेच पावसाळ्यात जनावरांना जंत निर्मूलन करून घेणे आवश्यक आहे. जंतनाशक औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत. जनावरांच्या शरीरावरील जंतांचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताचे प्रमाण वाढून शरीरावरील ताण कमी होतो व जनावरे आजारांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते, असे गिरीश गभणे यांनी सांगितले.

यासोबतच पशुपालकांनी जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. म्हशींना घटसर्पाची, एक दीड वर्षाच्या गायी, म्हशीच्या वासरांना एकटांग्याची व शेळ्या-मेंढ्यांना आंत्रविषाराची लस टोचून घ्यावी. या सर्व लसी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय जनावरांना स्वच्छ पाणी पाजावे. गोठ्याची स्वच्छता ठेवावी, गोठ्याच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, बुरशी लागलेली व काळपट तण खायला घालू नये, अधिक डास असल्यास गोठ्यात पंखा लावावा. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने गावागावात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरांमध्ये पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डाॅ. गभणे यांनी यावेळी केले.