शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

मार्ग दिशादर्शक फलकावर दीक्षाभूमीची नोंद घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:00 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ आॅक्टोबर १९५६ ला तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ आॅक्टोबर १९५६ ला तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ही भूमी ‘दीक्षाभूमी’ या नावाने जगप्रसिद्ध पावली. चंद्रपूर शहरातील या ऐतिहासिक व पवित्र ‘दीक्षाभूमी’ वर देश विदेशातील बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायी दरवर्षी लखोच्या संख्येने श्रद्धाभावाने येतात. त्यामुळे दिशादर्शक फलकावर दिक्षाभूमीची नोंद घ्यावी, अशी मागणी आहे. महानगरपालिका नियम विधीद्वारे चंद्रपूर शहरातील अनेक ऐतिहासिक व महत्त्वाच्या स्थळांचे दिशा दर्शविणारे मार्ग दिशादर्शक फलके शहराच्या विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध पावलेली ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’ हे स्थळ नोंदविण्यात आले नाही. हे बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखविणारी बाब आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूर व डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर व शहरातील बौद्ध बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ व २ यांना अ‍ॅड. राहुल घोटेकर सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. दीक्षाभूमीचे नाव मार्ग दिशादर्शक फलकावरून गडप कसे झाले, ही गंभीर बाब शासकीय पातळीवर विचार करणारी आहे. या प्रश्नाकडे चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग १ व २ यांनी जातीने लक्ष देऊन दीक्षाभूमीचे नाव मार्ग दिशादर्शक फलकावर लावण्यासाठी खंभीर भूमिका घ्यावी, अशी मागणी संस्थेचे सहसचिव कुणाल घोटेकर व व्यवस्थापक धर्मपाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, अनु दहेगावकर, कुणाल चहारे, स्वप्नील कांबळे, मुनेश्वर गजभिये, सिद्धार्थ पाथर्डे, डॉ. विजया गेडाम, प्रा. व्ही.एम. धडाडे, शिला दहिवले, प्रज्ञा रामटेके, अशोक कांबळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)