शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांची घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

 जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.

ठळक मुद्दे उत्पादन घटण्याची भीती : गहू, हरभरा पिके धोक्यात

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व भात लागवडीचे क्षेत्र मोठे असते. १५ पैकी चार तालुक्यात अजुनही सिंचनाच्या सुविधा वाढल्या नाही. त्यामुळे खरीपातील लागवड क्षेत्र अन्य तालुक्यांच्या तुलनेत अल्प असते. सध्या धानाचे चुरणे अंतिम टप्प्यात आहेत. कपाशीची काढणी सुरू आहे. दरम्यान, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले.  रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या पिकांना जपण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.  रब्बी हंगामात वाढलेला हरभरा पेरा नोंद घेण्यासारखाच आहे. परंतु, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कायार्लयाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी पथक तयार केले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता निर्माण होतो. पिकांना वाचविण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, ग्रामीण विकास कृषी व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीतर्फे तयार केलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहे.- डाॅ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

हरभरा लागवड करणारे शेतकरी चिंतातूर  यंदा हरभरा लागवड करणारे शेतकरी या हंगामात वाढले आहेत.  काही ठिकाणी हरभरा पिकाला शेंगा लागत आहे. सध्या तरी कोणत्याही कीड रोगाची लागण झाली नाही. शेंगा अद्याप परिपक्व झाल्या नाही. अशा स्थितीत अकाली पाऊस पडल्यास नुकसान हाेण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.

पाणी व खताच्या मात्रेकडे दुर्लक्ष नको ढगाळ वातावरणामुळे कीडरोग उद्भवण्याचा धोका आहे. अशावेळी शेतक-यांनी पिकांना अतिरिक्त पाणी देऊ नये. शिवाय, खतांची मात्रा देताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र चुकीची कीडनाशके वापरू नये. कृषी विभागाला सूचना देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेती