शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांची घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

 जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.

ठळक मुद्दे उत्पादन घटण्याची भीती : गहू, हरभरा पिके धोक्यात

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व भात लागवडीचे क्षेत्र मोठे असते. १५ पैकी चार तालुक्यात अजुनही सिंचनाच्या सुविधा वाढल्या नाही. त्यामुळे खरीपातील लागवड क्षेत्र अन्य तालुक्यांच्या तुलनेत अल्प असते. सध्या धानाचे चुरणे अंतिम टप्प्यात आहेत. कपाशीची काढणी सुरू आहे. दरम्यान, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले.  रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या पिकांना जपण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.  रब्बी हंगामात वाढलेला हरभरा पेरा नोंद घेण्यासारखाच आहे. परंतु, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कायार्लयाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी पथक तयार केले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता निर्माण होतो. पिकांना वाचविण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, ग्रामीण विकास कृषी व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीतर्फे तयार केलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहे.- डाॅ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

हरभरा लागवड करणारे शेतकरी चिंतातूर  यंदा हरभरा लागवड करणारे शेतकरी या हंगामात वाढले आहेत.  काही ठिकाणी हरभरा पिकाला शेंगा लागत आहे. सध्या तरी कोणत्याही कीड रोगाची लागण झाली नाही. शेंगा अद्याप परिपक्व झाल्या नाही. अशा स्थितीत अकाली पाऊस पडल्यास नुकसान हाेण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.

पाणी व खताच्या मात्रेकडे दुर्लक्ष नको ढगाळ वातावरणामुळे कीडरोग उद्भवण्याचा धोका आहे. अशावेळी शेतक-यांनी पिकांना अतिरिक्त पाणी देऊ नये. शिवाय, खतांची मात्रा देताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र चुकीची कीडनाशके वापरू नये. कृषी विभागाला सूचना देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेती