शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांची घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

 जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.

ठळक मुद्दे उत्पादन घटण्याची भीती : गहू, हरभरा पिके धोक्यात

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व भात लागवडीचे क्षेत्र मोठे असते. १५ पैकी चार तालुक्यात अजुनही सिंचनाच्या सुविधा वाढल्या नाही. त्यामुळे खरीपातील लागवड क्षेत्र अन्य तालुक्यांच्या तुलनेत अल्प असते. सध्या धानाचे चुरणे अंतिम टप्प्यात आहेत. कपाशीची काढणी सुरू आहे. दरम्यान, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले.  रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या पिकांना जपण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.  रब्बी हंगामात वाढलेला हरभरा पेरा नोंद घेण्यासारखाच आहे. परंतु, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कायार्लयाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी पथक तयार केले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता निर्माण होतो. पिकांना वाचविण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, ग्रामीण विकास कृषी व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीतर्फे तयार केलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहे.- डाॅ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

हरभरा लागवड करणारे शेतकरी चिंतातूर  यंदा हरभरा लागवड करणारे शेतकरी या हंगामात वाढले आहेत.  काही ठिकाणी हरभरा पिकाला शेंगा लागत आहे. सध्या तरी कोणत्याही कीड रोगाची लागण झाली नाही. शेंगा अद्याप परिपक्व झाल्या नाही. अशा स्थितीत अकाली पाऊस पडल्यास नुकसान हाेण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.

पाणी व खताच्या मात्रेकडे दुर्लक्ष नको ढगाळ वातावरणामुळे कीडरोग उद्भवण्याचा धोका आहे. अशावेळी शेतक-यांनी पिकांना अतिरिक्त पाणी देऊ नये. शिवाय, खतांची मात्रा देताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र चुकीची कीडनाशके वापरू नये. कृषी विभागाला सूचना देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेती