शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांची घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

 जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.

ठळक मुद्दे उत्पादन घटण्याची भीती : गहू, हरभरा पिके धोक्यात

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व भात लागवडीचे क्षेत्र मोठे असते. १५ पैकी चार तालुक्यात अजुनही सिंचनाच्या सुविधा वाढल्या नाही. त्यामुळे खरीपातील लागवड क्षेत्र अन्य तालुक्यांच्या तुलनेत अल्प असते. सध्या धानाचे चुरणे अंतिम टप्प्यात आहेत. कपाशीची काढणी सुरू आहे. दरम्यान, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले.  रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या पिकांना जपण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.  रब्बी हंगामात वाढलेला हरभरा पेरा नोंद घेण्यासारखाच आहे. परंतु, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कायार्लयाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी पथक तयार केले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता निर्माण होतो. पिकांना वाचविण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, ग्रामीण विकास कृषी व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीतर्फे तयार केलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहे.- डाॅ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

हरभरा लागवड करणारे शेतकरी चिंतातूर  यंदा हरभरा लागवड करणारे शेतकरी या हंगामात वाढले आहेत.  काही ठिकाणी हरभरा पिकाला शेंगा लागत आहे. सध्या तरी कोणत्याही कीड रोगाची लागण झाली नाही. शेंगा अद्याप परिपक्व झाल्या नाही. अशा स्थितीत अकाली पाऊस पडल्यास नुकसान हाेण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.

पाणी व खताच्या मात्रेकडे दुर्लक्ष नको ढगाळ वातावरणामुळे कीडरोग उद्भवण्याचा धोका आहे. अशावेळी शेतक-यांनी पिकांना अतिरिक्त पाणी देऊ नये. शिवाय, खतांची मात्रा देताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र चुकीची कीडनाशके वापरू नये. कृषी विभागाला सूचना देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेती