शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
4
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
5
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
6
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
7
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
8
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
9
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
10
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
11
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
12
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
13
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
14
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
15
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
16
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
17
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
18
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
19
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
20
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग

प्रगतीसाठी आर्थिक योजनांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:13 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : वरोरा येथे कृषी मेळावा

आॅनलाईन लोकमतवरोरा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरिय कृषी मेळाव्यातील पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना शामकुळे, स्वागताध्यक्ष तथा जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, महापौर अंजली घोटेकर, माजी पालकमंत्री संजय देवतळे, उपमहापौर अनिल फुलझेले, जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुल सराफ, बाबा भागडे, नरेंद्र जिवतोडे , जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि. प. सभापती गोदावरी केंद्रे, जि.प. सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. हसनाबादे डॉ. विद्या मानकर उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, अनेक पदवीधर, उच्चशिक्षित युवक शेती व्यवसाय आज करीत आहेत. कृषी मेळाव्यातील ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून व्यावसायिक पद्धतीने शेती केली पाहिजे. शिवाय, शेतीपूरक व्यवसायांचाही पर्याय स्वीकारावा. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जैविक, सेंद्रीय व शेणखताचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रामदेव बाबा यांनी कृषी मेळाव्याला भेट देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशीवरोरा, भद्रावती तालुक्यात चार लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात शेती व्यवसाय आहे. शेतकºयांनी वैविध्यपूर्ण पिके घ्यावीत. फवारणी करताना मृत्यू ओढावलेल्या राज्यातील शेतकºयांना दोन लाख आणि गारपीट बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांनाही तत्काळ मदत देऊ, अशी ग्वाही ना. अहीर यांनी दिली. केंद्र सरकारने ग्रामीण विकासाकरिता १४ लाख कोटी दिले. शेतकºयांना शेतीपूरक व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी चंद्रपूर व वणी क्षेत्रामध्ये सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना विविध वाणांचे बियाणे वाटप केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तज्ज्ञांचे मार्गदर्शनहळद आणि दूधाला जागतिक स्तरावर मागणी आहे. जिल्ह्यात १४ ठिकाणी मदर डेअरीचे केंद्र सुरू करण्यात आले. गायी-म्हशींचे पालन केल्यास आर्थिक आधार मिळेल. सरकारकडून मूबलक निधी देण्यात येणार आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील शेतकºयांच्या समस्या लक्षात घेवून विविध व्यवसाय उभारण्यासाठी तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.