शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीसाठी आर्थिक योजनांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:13 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : वरोरा येथे कृषी मेळावा

आॅनलाईन लोकमतवरोरा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरिय कृषी मेळाव्यातील पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना शामकुळे, स्वागताध्यक्ष तथा जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, महापौर अंजली घोटेकर, माजी पालकमंत्री संजय देवतळे, उपमहापौर अनिल फुलझेले, जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुल सराफ, बाबा भागडे, नरेंद्र जिवतोडे , जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि. प. सभापती गोदावरी केंद्रे, जि.प. सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. हसनाबादे डॉ. विद्या मानकर उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, अनेक पदवीधर, उच्चशिक्षित युवक शेती व्यवसाय आज करीत आहेत. कृषी मेळाव्यातील ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून व्यावसायिक पद्धतीने शेती केली पाहिजे. शिवाय, शेतीपूरक व्यवसायांचाही पर्याय स्वीकारावा. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जैविक, सेंद्रीय व शेणखताचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रामदेव बाबा यांनी कृषी मेळाव्याला भेट देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशीवरोरा, भद्रावती तालुक्यात चार लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात शेती व्यवसाय आहे. शेतकºयांनी वैविध्यपूर्ण पिके घ्यावीत. फवारणी करताना मृत्यू ओढावलेल्या राज्यातील शेतकºयांना दोन लाख आणि गारपीट बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांनाही तत्काळ मदत देऊ, अशी ग्वाही ना. अहीर यांनी दिली. केंद्र सरकारने ग्रामीण विकासाकरिता १४ लाख कोटी दिले. शेतकºयांना शेतीपूरक व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी चंद्रपूर व वणी क्षेत्रामध्ये सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना विविध वाणांचे बियाणे वाटप केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तज्ज्ञांचे मार्गदर्शनहळद आणि दूधाला जागतिक स्तरावर मागणी आहे. जिल्ह्यात १४ ठिकाणी मदर डेअरीचे केंद्र सुरू करण्यात आले. गायी-म्हशींचे पालन केल्यास आर्थिक आधार मिळेल. सरकारकडून मूबलक निधी देण्यात येणार आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील शेतकºयांच्या समस्या लक्षात घेवून विविध व्यवसाय उभारण्यासाठी तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.