शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

प्रगतीसाठी आर्थिक योजनांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:13 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : वरोरा येथे कृषी मेळावा

आॅनलाईन लोकमतवरोरा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरिय कृषी मेळाव्यातील पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना शामकुळे, स्वागताध्यक्ष तथा जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, महापौर अंजली घोटेकर, माजी पालकमंत्री संजय देवतळे, उपमहापौर अनिल फुलझेले, जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुल सराफ, बाबा भागडे, नरेंद्र जिवतोडे , जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि. प. सभापती गोदावरी केंद्रे, जि.प. सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. हसनाबादे डॉ. विद्या मानकर उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, अनेक पदवीधर, उच्चशिक्षित युवक शेती व्यवसाय आज करीत आहेत. कृषी मेळाव्यातील ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून व्यावसायिक पद्धतीने शेती केली पाहिजे. शिवाय, शेतीपूरक व्यवसायांचाही पर्याय स्वीकारावा. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जैविक, सेंद्रीय व शेणखताचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रामदेव बाबा यांनी कृषी मेळाव्याला भेट देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशीवरोरा, भद्रावती तालुक्यात चार लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात शेती व्यवसाय आहे. शेतकºयांनी वैविध्यपूर्ण पिके घ्यावीत. फवारणी करताना मृत्यू ओढावलेल्या राज्यातील शेतकºयांना दोन लाख आणि गारपीट बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांनाही तत्काळ मदत देऊ, अशी ग्वाही ना. अहीर यांनी दिली. केंद्र सरकारने ग्रामीण विकासाकरिता १४ लाख कोटी दिले. शेतकºयांना शेतीपूरक व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी चंद्रपूर व वणी क्षेत्रामध्ये सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना विविध वाणांचे बियाणे वाटप केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तज्ज्ञांचे मार्गदर्शनहळद आणि दूधाला जागतिक स्तरावर मागणी आहे. जिल्ह्यात १४ ठिकाणी मदर डेअरीचे केंद्र सुरू करण्यात आले. गायी-म्हशींचे पालन केल्यास आर्थिक आधार मिळेल. सरकारकडून मूबलक निधी देण्यात येणार आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील शेतकºयांच्या समस्या लक्षात घेवून विविध व्यवसाय उभारण्यासाठी तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.