शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

मुख्य प्रवर्तक व सचिवावर कारवाई करा

By admin | Updated: May 28, 2016 01:09 IST

देवाडा खुर्द येथील बोगस मजूर संस्थेच्या नावावर लाखो रुपयांची कामे करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल करण्यात आलेली आहे.

सभासदांची मागणी :बोगस मजूर संस्थेच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहारपोंभूर्णा : देवाडा खुर्द येथील बोगस मजूर संस्थेच्या नावावर लाखो रुपयांची कामे करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. यावर यापूर्वीचे ठाणेदारांनी कुठलीच कारवाई न केल्याने संबंधित संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिव अजूनही मोकाट फिरत आहे. या प्रकरणाची नवीन महिला ठाणेदारांनी सखोल चौकशी केल्यास फार मोठे सत्य समोर येणार आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी करुन यातील दोषी व्यक्तींवर कारवाई होणार काय, असा प्रश्न अन्यायग्रस्त सभासदांकडून केला जात आहे.तालुक्यातील देवाडा खुर्द येथील मजुरांना कुठलीही माहिती न देता त्यांच्या नावाचे खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करुन सभासदांच्या नावासमोर बोगस छायाचित्राचा वापर करुन बोगस मजूर संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्या संस्थेच्या नावावर जवळपास एक कोटी रुपयाची कामे करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल करण्यात आली. याबाबत अन्यायग्रस्त सभासदांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आणि पोंभूर्णा येथील तत्कालिन ठाणेदार वासमवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. परंतु याला तब्बल तीन ते चार महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा वासमवार बोगस मजूर संस्थेच्या मुख्य प्रवर्तक व सचिवावर कोणीच कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित व्यक्ती अजूनही मोकाटच फिरत आहेत. आतातरी नवीन महिला ठाणेदारांकडून त्यांच्यावर कारवाई होणार काय, असा प्रश्न अन्यायग्रस्त सभासदांमध्ये निर्माण झाला आहे.पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील बोगस पट्टेधारकांचे लोन संबंध तालुक्यात घोंगावत असतानाच माहितीच्या अधिकारातून पुन्हा दुसरे प्रकरण उघडकीस आले. येथील बोगस पट्टेधारक पुंडलिक कवडू बुरांडे यांनी आपल्या लहान भावाला व भाच्याला हाताशी धरुन चक्क गावातील मृत व्यक्तीच्या व गाव सोडून रोजगारासाठी बाहेरगावी असणाऱ्या आणि गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करुन त्यांच्या नावासमोर स्वत:च बोगस स्वाक्षऱ्या केल्या व साईकृपा मजूर सहकारी संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागामधून एक कोटी रुपयांच्या वरील कामे करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल केली. त्यामुळे अन्यायग्रस्त सभासदांनी पोंभूर्णा पोलीस स्टेशन व संबंधित विभागाकडे तक्रार केली. परंतु अजूनपर्यंत कुठलीच कारवाई न झाल्याने सदर प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अन्यायग्रस्त सभासदांकडून केला जात आहे.पोंभूर्णा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या महिला ठाणेदारांनी १५ दिवसातच आपले वर्चस्व व अधिकाराचा वापर करुन तालुक्यातील संपूर्ण अवैध दारु विक्रेत्यांना वठनीवर आणले आहे. संबंधित अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून तालुका परिसरामध्ये शांतता नांदत आहे. त्यामुळे या नवीन महिला ठाणेदार निर्मला किन्नाके देवाडा खुर्द येथील बोगस साईकृपा मजूर संस्थेच्या मुख्य प्रवर्तकावर व सचिवार काय कारवाई करतात, याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)