शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रस्ते कामांची चौकशी करून कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:30 IST

शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. गेल्या आठवडाभरात चंद्रपूर शहरात नंदा बेहरम आणि काजल पाल या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राजुरा तालुक्यात सख्या भावंडाचा खड्डे अपघातात मृत्यू झाला. रस्ते बांधकामात झालेल्या गैरव्यवहारामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडत आहेत.

ठळक मुद्देजनधिकार सन्मान रक्षा संघर्ष समिती : अधीक्षक अभियंता, मनपा आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. गेल्या आठवडाभरात चंद्रपूर शहरात नंदा बेहरम आणि काजल पाल या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राजुरा तालुक्यात सख्या भावंडाचा खड्डे अपघातात मृत्यू झाला. रस्ते बांधकामात झालेल्या गैरव्यवहारामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडत आहेत. मनपा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी दोषी असून रस्ते कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जनअधिकार सन्मान रक्षा संघर्ष समितीने अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले.यावेळी समितीचे अध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धुन्ना, माजी नगरसेविका अमरजित कौर धुन्ना, रविंद्र बलकी, अरविंद मुच्युलवार, पप्पु शेंडे, सुशिलकुमार मिश्रा, निखिल राजुकर उपस्थित होते. रस्त्यांवर पडलेल्या खड्डयामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने मृतकांच्या कुटुंबियांना ५० लाखांची भरपाई द्यावी, रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात यावे, जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी करण्यात यावी, महानगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघात होवून अनेक नागरिकांचे हातपाय मोडले आहे, त्यांची सुद्धा दखल मनपा व बांधकाम विभागाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी दुर्गा पाईनकर, साधना दुरूटकर, सीताबाई गजर, नसीम पठाण, सयाबाई भगाडे, मालावती चक्रवती, रेखा घोनमोडे, सुमन डेकाटे, विठ्ठल झुंगे, मंगळा भुसारी, तुळजाबाई भोयर, फैमिदा शेख, हमीद शेख, गजानन पोईनकर, श्याम उराडे, शेंबेकर, दीपक खाडीलकर, महेश तावाडे, अर्जूनसिंह धुन्ना आदी नागरिक उपस्थित होते.