शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपघात प्रवण क्षेत्रात उपायोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:42 IST

जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रात संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी दिले. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : पोलीस मुख्यालयात रस्त्यांचा आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रात संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी दिले. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी खेमणार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आयुक्त संजय काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्या साखरवडे, कार्यकारी अभियंता जयस्वाल, जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, २०१५ ते २०१७ या वर्षात जिल्ह्यात अपघात व मृत्यंूचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात दरवर्षी दीड लाख लोकांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील २८ ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र म्हणून परिवहन विभागाने निवड केली. शिवाय उपाययोजनाही सुचविल्या आहेत. काही उपाययोजना दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापौर अंजली घोटेकर यांनी वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची विनामूल्य मदत घेण्याचा प्रस्ताव या बैठकीत ठेवला. ना. अहीर यांनी या प्रस्तावा दुजोरा दिला. जिल्ह्यात अवैध बस वाहतूक, जड वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत आहे. अशा वाहणांवर कडक करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५ लाख ७४ हजार वाहने असून त्यामध्ये ४ लाख ७० हजार दुचाकी आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने असल्याने परिवहन नियमन करणे जिकरीचे होते. जिल्ह्यातून १०७ कोटींचा महसूल परिवहन विभागाकडून राज्य सरकारला मिळतो. त्यामुळे विभागाचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येईल, असेही ना. अहीर यांनी सांगितले. अशा प्रकारची बैठक तीन महिन्यांतून एकदा घ्यायची असली तरी दोन महिन्यांच्या आत बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार व पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी जिल्ह्याची माहिती सादर केली.