शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:10 IST

‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’

ठळक मुद्देचिमूरचा ७५ वर्षांपूर्वीचा रणसंग्राम : नागपंचमीच्या बाºयातूनच घडला उठाव

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. इंग्रजांच्या गुलामीतून भारताला मुक्त करण्यासाठी युवकांनी १६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीच्या दिवशी इंग्रज झुलमी अधिकारी एसडीओ डुगांजी, नायब तहसीलदार सोनवाने व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित ठरली होती.इंग्रजांची जुलमी सत्ता भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजींनी ८ आॅगस्ट १९४२ ला मुंबई येथून ‘करा अथवा मरा’ असा संदेश दिला. या आदेशाने तरुणांना नवी स्फुर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवक क्रांतीकारांनी स्वातंत्र्यासाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्याला १२ आॅगस्ट १९४२ ला सुरूवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरीत करित होते.१५ आॅगस्ट १९४२ ला सकाळच्या सत्संगाच्या वेळी तुकडोजी महाराज यांनी ठाणेदार हरिराम शर्मा यांची भेट घेतली. नंतर गावात भव्य मिरवणूक काढून रात्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे देशभक्तीपर जोशपूर्ण भजन, ‘पत्थर सारे बाम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना’ याची महाराजांनी जनतेला जाणीव करून दिली. महाराजाच्या या क्रांतीकारी भजनाने चिमुरातील क्रांतीकारक पेटून उठले होते. त्यांच्या मनात इंग्रजाविषयी मोठा द्वेष उफळला होता.१६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करीत बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपालराव कोरेकर यांच्या नेतृत्वात अभुतपुर्व प्रभातफेरी काढली. या फेरीत काँग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. तिथे ‘व्हाइसराय दिल्ली मे, जुते खाओ गल्ली मे’ अशा घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे नागमंदिराजवळ शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतीकारकांच्या मनात वेगळेच होते.राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत झालेल्या क्रांतीकारांपैकी सेवादलचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येवून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिले.तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविराच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व १२ क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतीकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुगांजी, सोनवाने व जरासह यांच्याकडे वळविला व या तिन्ही अधिकाºयांना यमसदमी धाडले. याकरिता अनेक क्रांतीकारकांना लाठीमार खावा लागला. तर याच दिवशी १६ वर्षाचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे यांना १६ आॅगस्ट १९४२ नागपंचमीच्या दिवशी विरमरण येवून क्रांतीभूमीसाठी शहीद झाले. त्यामुळे १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरासाठी रक्तरंजित ठरली होती.