शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:10 IST

‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’

ठळक मुद्देचिमूरचा ७५ वर्षांपूर्वीचा रणसंग्राम : नागपंचमीच्या बाºयातूनच घडला उठाव

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. इंग्रजांच्या गुलामीतून भारताला मुक्त करण्यासाठी युवकांनी १६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीच्या दिवशी इंग्रज झुलमी अधिकारी एसडीओ डुगांजी, नायब तहसीलदार सोनवाने व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित ठरली होती.इंग्रजांची जुलमी सत्ता भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजींनी ८ आॅगस्ट १९४२ ला मुंबई येथून ‘करा अथवा मरा’ असा संदेश दिला. या आदेशाने तरुणांना नवी स्फुर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवक क्रांतीकारांनी स्वातंत्र्यासाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्याला १२ आॅगस्ट १९४२ ला सुरूवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरीत करित होते.१५ आॅगस्ट १९४२ ला सकाळच्या सत्संगाच्या वेळी तुकडोजी महाराज यांनी ठाणेदार हरिराम शर्मा यांची भेट घेतली. नंतर गावात भव्य मिरवणूक काढून रात्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे देशभक्तीपर जोशपूर्ण भजन, ‘पत्थर सारे बाम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना’ याची महाराजांनी जनतेला जाणीव करून दिली. महाराजाच्या या क्रांतीकारी भजनाने चिमुरातील क्रांतीकारक पेटून उठले होते. त्यांच्या मनात इंग्रजाविषयी मोठा द्वेष उफळला होता.१६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करीत बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपालराव कोरेकर यांच्या नेतृत्वात अभुतपुर्व प्रभातफेरी काढली. या फेरीत काँग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. तिथे ‘व्हाइसराय दिल्ली मे, जुते खाओ गल्ली मे’ अशा घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे नागमंदिराजवळ शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतीकारकांच्या मनात वेगळेच होते.राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत झालेल्या क्रांतीकारांपैकी सेवादलचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येवून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिले.तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविराच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व १२ क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतीकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुगांजी, सोनवाने व जरासह यांच्याकडे वळविला व या तिन्ही अधिकाºयांना यमसदमी धाडले. याकरिता अनेक क्रांतीकारकांना लाठीमार खावा लागला. तर याच दिवशी १६ वर्षाचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे यांना १६ आॅगस्ट १९४२ नागपंचमीच्या दिवशी विरमरण येवून क्रांतीभूमीसाठी शहीद झाले. त्यामुळे १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरासाठी रक्तरंजित ठरली होती.