शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:10 IST

‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’

ठळक मुद्देचिमूरचा ७५ वर्षांपूर्वीचा रणसंग्राम : नागपंचमीच्या बाºयातूनच घडला उठाव

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. इंग्रजांच्या गुलामीतून भारताला मुक्त करण्यासाठी युवकांनी १६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीच्या दिवशी इंग्रज झुलमी अधिकारी एसडीओ डुगांजी, नायब तहसीलदार सोनवाने व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित ठरली होती.इंग्रजांची जुलमी सत्ता भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजींनी ८ आॅगस्ट १९४२ ला मुंबई येथून ‘करा अथवा मरा’ असा संदेश दिला. या आदेशाने तरुणांना नवी स्फुर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवक क्रांतीकारांनी स्वातंत्र्यासाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्याला १२ आॅगस्ट १९४२ ला सुरूवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरीत करित होते.१५ आॅगस्ट १९४२ ला सकाळच्या सत्संगाच्या वेळी तुकडोजी महाराज यांनी ठाणेदार हरिराम शर्मा यांची भेट घेतली. नंतर गावात भव्य मिरवणूक काढून रात्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे देशभक्तीपर जोशपूर्ण भजन, ‘पत्थर सारे बाम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना’ याची महाराजांनी जनतेला जाणीव करून दिली. महाराजाच्या या क्रांतीकारी भजनाने चिमुरातील क्रांतीकारक पेटून उठले होते. त्यांच्या मनात इंग्रजाविषयी मोठा द्वेष उफळला होता.१६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करीत बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपालराव कोरेकर यांच्या नेतृत्वात अभुतपुर्व प्रभातफेरी काढली. या फेरीत काँग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. तिथे ‘व्हाइसराय दिल्ली मे, जुते खाओ गल्ली मे’ अशा घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे नागमंदिराजवळ शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतीकारकांच्या मनात वेगळेच होते.राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत झालेल्या क्रांतीकारांपैकी सेवादलचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येवून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिले.तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविराच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व १२ क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतीकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुगांजी, सोनवाने व जरासह यांच्याकडे वळविला व या तिन्ही अधिकाºयांना यमसदमी धाडले. याकरिता अनेक क्रांतीकारकांना लाठीमार खावा लागला. तर याच दिवशी १६ वर्षाचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे यांना १६ आॅगस्ट १९४२ नागपंचमीच्या दिवशी विरमरण येवून क्रांतीभूमीसाठी शहीद झाले. त्यामुळे १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरासाठी रक्तरंजित ठरली होती.