शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:10 IST

‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’

ठळक मुद्देचिमूरचा ७५ वर्षांपूर्वीचा रणसंग्राम : नागपंचमीच्या बाºयातूनच घडला उठाव

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. इंग्रजांच्या गुलामीतून भारताला मुक्त करण्यासाठी युवकांनी १६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीच्या दिवशी इंग्रज झुलमी अधिकारी एसडीओ डुगांजी, नायब तहसीलदार सोनवाने व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित ठरली होती.इंग्रजांची जुलमी सत्ता भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजींनी ८ आॅगस्ट १९४२ ला मुंबई येथून ‘करा अथवा मरा’ असा संदेश दिला. या आदेशाने तरुणांना नवी स्फुर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवक क्रांतीकारांनी स्वातंत्र्यासाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्याला १२ आॅगस्ट १९४२ ला सुरूवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरीत करित होते.१५ आॅगस्ट १९४२ ला सकाळच्या सत्संगाच्या वेळी तुकडोजी महाराज यांनी ठाणेदार हरिराम शर्मा यांची भेट घेतली. नंतर गावात भव्य मिरवणूक काढून रात्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे देशभक्तीपर जोशपूर्ण भजन, ‘पत्थर सारे बाम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना’ याची महाराजांनी जनतेला जाणीव करून दिली. महाराजाच्या या क्रांतीकारी भजनाने चिमुरातील क्रांतीकारक पेटून उठले होते. त्यांच्या मनात इंग्रजाविषयी मोठा द्वेष उफळला होता.१६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करीत बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपालराव कोरेकर यांच्या नेतृत्वात अभुतपुर्व प्रभातफेरी काढली. या फेरीत काँग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. तिथे ‘व्हाइसराय दिल्ली मे, जुते खाओ गल्ली मे’ अशा घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे नागमंदिराजवळ शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतीकारकांच्या मनात वेगळेच होते.राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत झालेल्या क्रांतीकारांपैकी सेवादलचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येवून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिले.तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविराच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व १२ क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतीकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुगांजी, सोनवाने व जरासह यांच्याकडे वळविला व या तिन्ही अधिकाºयांना यमसदमी धाडले. याकरिता अनेक क्रांतीकारकांना लाठीमार खावा लागला. तर याच दिवशी १६ वर्षाचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे यांना १६ आॅगस्ट १९४२ नागपंचमीच्या दिवशी विरमरण येवून क्रांतीभूमीसाठी शहीद झाले. त्यामुळे १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरासाठी रक्तरंजित ठरली होती.