शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी टाहो !

By admin | Updated: January 8, 2016 01:44 IST

पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण गरज समजले जाणारे पाणीच नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे.

रवी जवळे चंद्रपूरपाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण गरज समजले जाणारे पाणीच नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे. सर्व बाजुने नागरिकांची ओरड झाल्यानंतर मनपाच्या आमसभेत पाणी पुरवठ्यावर बराच गदारोळ झाला. मनपाने टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याचा निर्णयही दिला. प्रत्यक्षात ही कारवाई सुरुदेखील झाली आहे. मात्र पाणी पुरवठा काही सुरळीत झाला नाही. मनपा कारवाई करीत असली तरी या कारवाईमुळे नागरिकांना अजूनही दिलासा मिळू शकला नाही. चंद्रपूरकरांना पाणी हवे आहे, आणि त्यासाठी ते आजही टाहो फोडत आहेत. पाणीला जीवन म्हटले जाते. पाणी ही प्रत्येकाची मुलभूत व महत्त्वपूर्ण गरज आहे. प्रत्येकाला पाणी मिळणे हा त्याचा हक्कही आहे. मात्र चंद्रपूरकरांकडून हा हक्कच हिरावून घेतला जात आहे. ज्या इरई धरणातून चंद्रपूरला पाणी पुरवठा होतो, तिथेही मुबलक पाणी आहे. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहचविण्याची यंत्रणाही अस्तित्वात आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कंत्राटी कंपनी व कंपनीवर वचक ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनही आहे. वरकरणी कुठेही मोठी अडचण दिसत नाही. तरीही नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाले आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, भानापेठ वार्ड, बालाजी वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, जीवन ज्योती कॉलनी, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अतिशय कमी पाणी पुरवठा केला जात आहे. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. अनेकवेळा तर नळच येत नाही. पूर्वी नळ येत असला की तशी सूचना ध्वनीक्षेपकांमार्फत नागरिकांना दिली जात होती. आता संबंधित कंत्राटदाराला त्याचेही महत्त्व वाटत नाही.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नागरिकांना कोणतीही सूचना न देता नळ पहाटे ४ वाजता सोडण्यात येत होते. नागरिक सकाळी सात-आठ वाजता उठायचे, तेव्हा नळ गेला असायचा. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. काही नागरिकांनी याबाबत कंत्राटदारांकडे जाऊन विचारणा केली असता त्यांना पहाटेच नळ सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आताही काही ठिकाणी असाच प्रकार सुरू आहे. यामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत.शहराला हवे ४० दशलक्ष मीटर पाणीचंद्रपूर शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात आहे. संपूर्ण शहराला दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज असल्याची माहिती मनपाचे अभियंता बोरीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. प्रत्येक व्यक्तीला ९० ते १०० लिटर पाणी दररोज लागते. मात्र यापैकी ३० ते ३५ लिटरही पाणी दरडोई मिळत नाही.तक्रार करूनही दखल नाहीहॉस्पीटल वॉर्डात मागील अनेक दिवसांपासून पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. काही नळांमधून थोडेतरी पाणी येते. मात्र काही नळातून पाणीच येत नाही. आलेच तर एक गुंड भरायला २० मिनिटे लागतात. त्यानंतर अल्पावधीतच नळ बंद होतो. याबाबत नागरिकांनी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र एकदोन ठिकाणी खोदकाम करण्यापलिकडे काहीही केले नाही.कारवाई करा; मात्र आधी पाणी द्यानागरिकांना कोणत्याही परिस्थितीत दररोज पाणी हवे आहे. पाणी पुरवठा सुरळीत नाही म्हणून मनपाद्वारे संबंधित कंपनीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ जानेवारीपासून पाणीपट्टी मनपा कार्यालयात भरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पुढे मनपा आणखी कारवाईचे दुसरे पाऊल उचलेल. यात बराच कालावधी लोटून जाईल. त्यामुळे मनपाने कारवाई करण्यासोबतच नागरिकांना दररोज पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.