शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ताडोबा आधुनिक भारतातील निसर्ग तीर्थक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:48 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले की समृद्ध जंगल आणि त्यातील वन्यप्राणी जीवन हेच समीकरण समोर येते.

ठळक मुद्देसिंधुताई सपकाळ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पहिल्यांदा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले की समृद्ध जंगल आणि त्यातील वन्यप्राणी जीवन हेच समीकरण समोर येते. हमखास व्याघ्र दर्शनासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा आधुनिक जगातील निसर्ग तीर्थक्षेत्र होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माई डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केले.वृक्षदिंडी आणि स्वच्छता महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी माई आल्यावर त्यांनी पहिल्यांदा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.पुढे बोलताना सिंधुताई म्हणाल्या, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारताचे भूषण आणि संपूर्ण जगाचे वैभव आहे. ताडोबा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प आहे. येथे असलेली वाघांची संख्याही इतरत्र असलेल्या प्रकल्पांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला वाघाचे दर्शन हे हमखास लाभतेच. दरवर्षी लाखोंच्या संखेने पर्यटक ताडोबाला येतात. ही बाब महत्त्वाची वाटते.कारण गोरगरीब तरुणांना, स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळतो, त्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. ताडोबामध्ये वाघ पहायला येणाºया पर्यटकांनी उच्छाद मांडू नये, आरडाओरड करू नये, गोंधळ घालू नये, आपल्या कृतीतून वाघ किंवा इतर कुठल्याही वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला किंवा वनसंपदेला, जैवविविधतेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी, अस आवाहन सिंधुतार्इंनी पर्यटकांना उद्देशून केले. पर्यटकांना निसर्गाचे महत्त्व कळावे आणि पर्यटनाबरोबच नैसर्गिक सौदर्य अबाधीत रहावे, पर्यटकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, पर्यटकांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने अधिक जनजागृती करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक अमोल बैस, शैलेंद्र बैस, ममता बालसदन पुणेचे व्यवस्थापक दीपक गायकवाड उपस्थित होते.मुनगंटीवारांमुळे वनविभागाला मिळाली ओळखराज्याचे कर्तबगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा वन विभागाला ओळख दिली आहे, वन विभागाचे कार्य लोकाभिमुख झाले. त्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी साडेचार वर्षात जीव ओतून काम केले आहे. ही बाब महत्त्वपूर्ण असून असा वनमंत्री होणे नाही, या शब्दात सिंधुतार्इंनी वनमंत्र्यांच्या कार्याची प्रशंसा केली. वाघांचे रक्षण करताना गोमातेला विसरू नका. तिला आपल्या काळजात जागा दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.वाघोबांची पूजा करणारा माझा भारतआजवर मी जगभरातील जवळपास २२ देशात फिरून आले आहे. देवळातले देव मी खूप पाहिले. पण आज जंगलातला देव पहिल्यांदा बघितला. उभ्या आयुष्यात प्रथमच मी ताडोबाला भेट दिली. तेव्हा मला इथे अनेक ठिकाणी वाघोबाचे मंदिर दिसले, वाघोबाला ताडोबातील स्थानिक लोक निसर्गदेवता मानून पूजा करतात. ही बाब मला अधिक आवडली आहे. कारण आतापर्यंत लोक स्वत:हून वाघोबांची पूजा करतात हे माहित नव्हत. हे फक्त ताडोबाला आल्यावर दिसले. येथील लोक वाघांना मारत नाहीत. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करतात, म्हणून बाबांनो वाघोबांची पूजा करणारा माझा भारत देश महानच आहे, असेही सिंधुताई सपकाळ म्हणाल्या.