शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

चंद्रपूर : श्रावण महिन्यामध्ये सण, उत्सव असतात. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये साखरेची मागणी वाढते. हीच संधी साधत ...

चंद्रपूर : श्रावण महिन्यामध्ये सण, उत्सव असतात. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये साखरेची मागणी वाढते. हीच संधी साधत व्यापारी साखरेचे भाव वाढवितात. या वर्षी तर इंधनाचे दर वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. त्यामुळे साखरेचेही भाव आणखी वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सामान्यांचा सणासुदीचा गोडवा काही प्रमाणात कमी होणार आहे.

सण, उत्सवाच्या काळात साखरेला मागणी वाढू लागल्याने साखरेचे दर वाढत आहेत. किरकोळ बाजारात सध्या साखर ३६ रुपये किलोने विकली जात आहे. या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

का वाढताहेत भाव?

मागील काही दिवसांमध्ये इंधन दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. वाहतूकदारांनी आपले दर वाढविल्यामुळे प्रत्येक वस्तूच्या किमती सध्यस्थितीत वाढल्या आहेत. व्यापारी वाहतुकीचा पैसा काढण्यासाठी भाव वाढवित आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.

बाॅक्स

सणासुदीच्या तसेच उत्सवांच्या दिवसांमध्ये साधारणत: साखरेची मागणी इतर दिवसांच्या तुलनेमध्ये वाढते. मागील काही दिवसांपासून साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली नसली तरी पुढील काही दिवसांवर असलेल्या विविध सण तसेच उत्सवांमुळे साखरेचे भाव वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

बाॅक्स

महिन्याचे बजेट वाढले

कोरोना संकट आहे. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. याच परिस्थितीमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडत आहे. केंद्र तसेच राज्य शासनाने महागाईवर नियंत्रण आणून सामान्यांना दिलासा देणे सध्या तरी गरजेचे आहे.

- वैशाली उमाटे

चंद्रपूर

मागील काही वर्षांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलचेही दर झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होतो. निवडणुका आल्या की राज्यकर्ते सामान्यांना केवळ आश्वासने देतात. त्यानंतर मात्र ते विसरतात. महागाईला मात्र सामान्य नागरिकांनाच तोंड द्यावे लागते.

- वर्षा सोयाम, चंद्रपूर