शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोलण्यातून वाढेल एकमेकांप्रती आत्मियता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:04 IST

संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब व सभोवतीचे सामाजिक पर्यावरण कसे असते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देप्रशासन अधिकारी (शिक्षण) नित यांचा सल्ला

संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब व सभोवतीचे सामाजिक पर्यावरण कसे असते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोड अन् लाघवी बोलण्यातून माणसे जुळतात. नकारात्मक बोलण्याने दुरावतात, असे मत चंद्रपूर मनपाचे प्रशासन अधिकारी (शिक्षण) नागेश नित यांनी व्यक्त केले.गोड बोलण्यामुळे खरे यातून एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण होते. तरीदेखील काही व्यक्ती याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतो. कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ शाळेतच जात जातो. अध्यापन व अध्ययनाची प्रक्रिया ही दुहेरी असते. यामध्ये संवाद हा घटक महत्त्वाचा ठरतो. विषय समजावून सांगताना शिक्षक रंजकतेचा वापर करत असतील तर ज्ञान विद्यार्थ्यांच्या मनात ठसते. ज्ञानग्रहनातील संकटे दूर होतात. मराठी संत साहित्यात अशी हजारो उदाहरणे आहेत. जगणे कितीही कष्टप्रद असो गोड बोलण्याने एका क्षणात दु:ख हलके होते.दैनंदिन आयुष्यात अनेकदा मतभेद निर्माण होतात. मात्र मनभेदांना थारा देऊ नये. बोलण्यातील माधुर्य टिकविण्याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. दोन पिढ्यांचा भाषिकस्तर आता बदलला असला तरी त्यातील गोडवा कदापि संपणार नाही, अशी शब्दसंपत्ती मराठी भाषेत आहे.