शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंबांचे सर्वेक्षण

By admin | Updated: September 2, 2015 00:46 IST

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाच्या सुचनेवरून ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्याच्या ...

स्वच्छता विभागाच्या सूचना : ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देणारचंद्रपूर: पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाच्या सुचनेवरून ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने सन २०१२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये कुटुंब संख्येमध्ये वाढ झाली असून वाढीव कुटुंबांना बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ठ करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन सर्वेची पायाभूत सुधारणा करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबईकडून राज्यातील जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.वाढीव कुटुंबाच्या माहितीचे एकत्रिकरण करुन विहित कालमर्यादेत माहिती सादर करावयाची आहे. यासाठी शासनस्तरावरुन कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ८ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करुन ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीच्या नमुना आठ नुसार वाढलेल्या कुटुंबाची माहिती एकत्रित करुन या वाढीव कुटुंबाना ग्रामसभेत मान्यता घ्यावयाची आहे. पंचायत समितीस्तरावर वाढीव कुटुंबांच्या माहितीचे एकत्रिकरण करणे व माहितीचा गोषवारा १३ सप्टेंबरपर्यंत तयार करावयाचा आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून ग्रामस्तरावर तयार करण्यात आलेली वाढीव कुटुंबाची माहिती ग्रामसभेच्या ठरावासह एकत्रित करुन संबंधित ंपंचायतसमितीस्तरावर १३ सप्टेंबरपूर्वी सादर करावी लागणार आहे. जिल्हास्तरावर माहितीचे एकत्रिकरण करणे व माहितीचा गोषवारा १९ सप्टेंबर २०१५ पर्यंत तयार करावयाच्या आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी वाढीव कुटुंबाची माहिती १९ सप्टेंबरपूर्वी स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषदकडे सादर करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरुन शासनास २७ सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील वाढीव कुटुंबाची एकत्रित माहिती सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर वाढीव कुटुंबांची माहिती एकत्रित करण्यासाठी ग्रामस्तरावर शासनाने ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना सर्व संबंधिताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते यांनी केल्या आहेत. या मोहिमेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांनी याकामी सहकार्य करण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)स्वच्छ भारत मिशन ग्रामस्तरावर सन २०१२ मध्ये बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. आज प्रत्येक गावात कुटुंब संख्येमध्ये वाढ झालेली आहे. ग्रामस्तरावरील वाढीव कुटुंबांना बेसलाईन सर्वेक्षणात समाविष्ठ करण्यासाठी बेसलाईन सर्वेक्षण सुधारणा करण्याची सुवर्ण संधी चालून आलेली आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसवेकांनी या कामास प्रथम प्राधान्य देऊन गावातील प्रत्येक वाढीव कुुटुंबाची अद्यावत माहिती एकत्रित करुन ग्रामसभेत ठेवावी.- रवींद्र मोहिते, उपमुख्यकार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता), जि.प. चंद्रपूर