शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंबांचे सर्वेक्षण

By admin | Updated: September 2, 2015 00:46 IST

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाच्या सुचनेवरून ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्याच्या ...

स्वच्छता विभागाच्या सूचना : ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देणारचंद्रपूर: पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाच्या सुचनेवरून ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने सन २०१२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये कुटुंब संख्येमध्ये वाढ झाली असून वाढीव कुटुंबांना बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ठ करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन सर्वेची पायाभूत सुधारणा करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबईकडून राज्यातील जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.वाढीव कुटुंबाच्या माहितीचे एकत्रिकरण करुन विहित कालमर्यादेत माहिती सादर करावयाची आहे. यासाठी शासनस्तरावरुन कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ८ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करुन ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीच्या नमुना आठ नुसार वाढलेल्या कुटुंबाची माहिती एकत्रित करुन या वाढीव कुटुंबाना ग्रामसभेत मान्यता घ्यावयाची आहे. पंचायत समितीस्तरावर वाढीव कुटुंबांच्या माहितीचे एकत्रिकरण करणे व माहितीचा गोषवारा १३ सप्टेंबरपर्यंत तयार करावयाचा आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून ग्रामस्तरावर तयार करण्यात आलेली वाढीव कुटुंबाची माहिती ग्रामसभेच्या ठरावासह एकत्रित करुन संबंधित ंपंचायतसमितीस्तरावर १३ सप्टेंबरपूर्वी सादर करावी लागणार आहे. जिल्हास्तरावर माहितीचे एकत्रिकरण करणे व माहितीचा गोषवारा १९ सप्टेंबर २०१५ पर्यंत तयार करावयाच्या आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी वाढीव कुटुंबाची माहिती १९ सप्टेंबरपूर्वी स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषदकडे सादर करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरुन शासनास २७ सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील वाढीव कुटुंबाची एकत्रित माहिती सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर वाढीव कुटुंबांची माहिती एकत्रित करण्यासाठी ग्रामस्तरावर शासनाने ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना सर्व संबंधिताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते यांनी केल्या आहेत. या मोहिमेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांनी याकामी सहकार्य करण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)स्वच्छ भारत मिशन ग्रामस्तरावर सन २०१२ मध्ये बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. आज प्रत्येक गावात कुटुंब संख्येमध्ये वाढ झालेली आहे. ग्रामस्तरावरील वाढीव कुटुंबांना बेसलाईन सर्वेक्षणात समाविष्ठ करण्यासाठी बेसलाईन सर्वेक्षण सुधारणा करण्याची सुवर्ण संधी चालून आलेली आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसवेकांनी या कामास प्रथम प्राधान्य देऊन गावातील प्रत्येक वाढीव कुुटुंबाची अद्यावत माहिती एकत्रित करुन ग्रामसभेत ठेवावी.- रवींद्र मोहिते, उपमुख्यकार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता), जि.प. चंद्रपूर