शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘सूर्यांश’ साहित्यिक व रसिकांमधील संवादसेतू

By admin | Updated: August 29, 2015 01:22 IST

साहित्यक्षेत्रात वावरत असताना अनेक नवोदित साहित्यिक कलावंत व लेखकांना साहित्यप्रवाहात सामावण्याची इच्छा असते.

चंद्रपूर : साहित्यक्षेत्रात वावरत असताना अनेक नवोदित साहित्यिक कलावंत व लेखकांना साहित्यप्रवाहात सामावण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या साहित्य संस्थांच्याही काही अडचणी असल्याने त्यांना मर्यादा येतात व अशावेळी छोट्या साहित्य संस्था नवोदित लेखकांसाठी महत्वपूर्ण ठरतात. चद्रपूरच्या सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंचाने ही भूमिका प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नवोदित लेखकांसाठी ही संस्था माहेरघर आहे. असे म्हणायला हरकत नाही. लेखक व रसिक यांच्यातल्या संवादाला जोडण्याकरिता सूर्यांश संवादसेतूचे काम करीत आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कादंबरीकार व साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. याप्रसंगी चंद्रपुरातील प्रसिद्ध चिकित्सक डॉ. अशोक वासलवार अध्यक्षस्थानी तर ख्वाडा चित्रपटाचे गीतकार विनायक पवार, प्रसिद्ध समीक्षक डॉ. श्याम मोहरकर, पावसाच्या कवीसंमेलनाचे अध्यक्ष विष्णू सोळंकी आणि विदर्भ साहित्य संघाचे मोहिते उपस्थित होते. सूर्यांशतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून साहित्य क्षेत्रात मागील सहा वर्षापासून पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. बाबुराव कोंतमवार स्मृती सूर्यांश पुरस्कार प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांना कविता लेखनासाठी, अशोकसिंग ठाकूर पुरस्कृत कादंबरी पुरस्कार मनोहर पाटील यांना ढलवा कादंबरीसाठी, गुलाबराव पेंदाम स्मृती कवितासंग्रह विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरुन’ या कवितासंग्रहाला आणि प्रा. दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार साधना लव्हाटे यांच्या ‘रंग गहीरे’ या कथासंग्रहाला तसेच गीता रायपूरे यांना नवोन्मेष पुरस्कार डॉ. शोभणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साधना लव्हाटे यांच्या वतीने रावजी चवरे व लोकनाथ यशवंत यांच्या वतीने आशीष देव यांनी पुरस्कार स्वीकारला. एक हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेने घेतलेल्या पावसाच्या कवितांच्या स्पर्धेत विजेते दिगंबर शिंदे, नरेशकुमार बोरीकर, सुनील पाटील, नीता कोंतमवार व सुरेश गारघाटे या कवींनाही सन्मानित करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)