शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्यांश’ साहित्यिक व रसिकांमधील संवादसेतू

By admin | Updated: August 29, 2015 01:22 IST

साहित्यक्षेत्रात वावरत असताना अनेक नवोदित साहित्यिक कलावंत व लेखकांना साहित्यप्रवाहात सामावण्याची इच्छा असते.

चंद्रपूर : साहित्यक्षेत्रात वावरत असताना अनेक नवोदित साहित्यिक कलावंत व लेखकांना साहित्यप्रवाहात सामावण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या साहित्य संस्थांच्याही काही अडचणी असल्याने त्यांना मर्यादा येतात व अशावेळी छोट्या साहित्य संस्था नवोदित लेखकांसाठी महत्वपूर्ण ठरतात. चद्रपूरच्या सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंचाने ही भूमिका प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नवोदित लेखकांसाठी ही संस्था माहेरघर आहे. असे म्हणायला हरकत नाही. लेखक व रसिक यांच्यातल्या संवादाला जोडण्याकरिता सूर्यांश संवादसेतूचे काम करीत आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कादंबरीकार व साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. याप्रसंगी चंद्रपुरातील प्रसिद्ध चिकित्सक डॉ. अशोक वासलवार अध्यक्षस्थानी तर ख्वाडा चित्रपटाचे गीतकार विनायक पवार, प्रसिद्ध समीक्षक डॉ. श्याम मोहरकर, पावसाच्या कवीसंमेलनाचे अध्यक्ष विष्णू सोळंकी आणि विदर्भ साहित्य संघाचे मोहिते उपस्थित होते. सूर्यांशतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून साहित्य क्षेत्रात मागील सहा वर्षापासून पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. बाबुराव कोंतमवार स्मृती सूर्यांश पुरस्कार प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांना कविता लेखनासाठी, अशोकसिंग ठाकूर पुरस्कृत कादंबरी पुरस्कार मनोहर पाटील यांना ढलवा कादंबरीसाठी, गुलाबराव पेंदाम स्मृती कवितासंग्रह विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरुन’ या कवितासंग्रहाला आणि प्रा. दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार साधना लव्हाटे यांच्या ‘रंग गहीरे’ या कथासंग्रहाला तसेच गीता रायपूरे यांना नवोन्मेष पुरस्कार डॉ. शोभणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साधना लव्हाटे यांच्या वतीने रावजी चवरे व लोकनाथ यशवंत यांच्या वतीने आशीष देव यांनी पुरस्कार स्वीकारला. एक हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेने घेतलेल्या पावसाच्या कवितांच्या स्पर्धेत विजेते दिगंबर शिंदे, नरेशकुमार बोरीकर, सुनील पाटील, नीता कोंतमवार व सुरेश गारघाटे या कवींनाही सन्मानित करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)