शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
4
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
5
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
6
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
7
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
8
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
9
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
10
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
11
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
12
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
13
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
14
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
15
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
16
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
17
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
19
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
20
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत

बालकही देताहेत कष्टाळलेल्या कुटुंबाला आधार

By admin | Updated: November 13, 2014 22:59 IST

खरं म्हणजे हे वय खेळण्या- बागडण्याचे, आईच्या मांडीवर बसून काळ्या पाटीवर रेषा ओढण्याचे, शाळेत बाईच्या तालाला सुर देऊन पाठ्यपुस्तकातील गाणी घोळण्याच, आणि जमलंच तर आईचा

नितीन मुसळे - सास्तीखरं म्हणजे हे वय खेळण्या- बागडण्याचे, आईच्या मांडीवर बसून काळ्या पाटीवर रेषा ओढण्याचे, शाळेत बाईच्या तालाला सुर देऊन पाठ्यपुस्तकातील गाणी घोळण्याच, आणि जमलंच तर आईचा पदर पकडून घरातली ईटुकली-मिटुकली कामे करण्याचे; पण या हक्काच्या प्राक्तनाला मुकलेली कित्येक छोटी-छोटी बालके आज ग्रामीण भागात आपल्या आई-वडिलांसोबत शेतात सुरू असलेल्या कापूस वेचणीला गुंतले असल्याचे दिसून येते. शेतमजुराअभावी हवालदिल झालेल्या आपल्या कुटुंबाकडे पाहून बालपणाला विसरून कित्येक बालके आपल्या या कष्टाळलेल्या कुटुंबाला आधार देताना दिसून येत आहेत.आपल्या कृषीप्रधान देशात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. परंतु सद्याच्या स्थितीला निसर्गाच्या अनियमिततेमुळे व शासकीय धोरणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. पिकवायला गेले तर पिकत नाही. पिकलेच तर भाव मिळत नाही. अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. या सर्व प्रकारात तर शेतमजुरांची कमतरता ही नविनच समस्या शेतकऱ्यांपुढे आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती या भागाला पांढऱ्या सोन्याची खाण समजली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतल्या जाते. कपाशीच्या उत्पादनात शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडते. सुरूवातीपासूनच या पिकाची मोठी काळजी घ्यावी लागते. डवरणी, फवारणी, खत देणे, निंदन अशा विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासतेच. कापसाची वेचणीसाठी मात्र मजुरांची अत्यंत आवश्यकता असते. परंतु या भागात एकाच वेळी सर्वांच्या शेतात पांढरे सोने लखलखत असते. त्यामुळे त्याची वेचणी करण्याकरिता मजूरही मोठ्या प्रमाणात लागते.परंतु सध्या ते मिळणे कठीण झाले आहे. मोठी मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी कुटुंबातील आबालवृद्धापासून बालकेही कापूस वेचणीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे.ज्या वयात आपले आयुष्य फुलवायचे आहे, त्या वयात ही मुले आपल्या कुटुंबासोबत शेतीकामात गुंतली आहेत. आई-वडीलांच्या व आपल्या कुटुंबाचे होणारे काबाडकष्ट पाहून या बालकांचेही मन बालपणापासून दूर गेले आहे. आपल्या कुटुंबाला काही आधार व्हावा, या हेतूने ते शेतात कापूस वेचणीचे काम करीत आहेत.