शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आधार संस्थेकडून मिळाला स्वर्गयात्रेला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:07 IST

मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संस्थेचे पदाधिकारी घरी जाऊन सांत्वन करून चार हजार रुपयांची मदत करतात.

ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : सांत्वनेसोबतच मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संस्थेचे पदाधिकारी घरी जाऊन सांत्वन करून चार हजार रुपयांची मदत करतात.मूल येथील संतोष रानगरवार, प्रशांत गटलेवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी आधार संस्थेची सामाजिक दृष्टिकोणातून स्थापन केली. आधार संस्थेअंतर्गत कुटुंबातील सर्व व्यक्तींकडून २२ रुपये सभासद शुल्क घेतल्या जाते. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना चार हजार रुपयांची मदत देऊन सांत्वना करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. जात आणि धर्माचा भेद न मानता सर्वांना समान मानल्याने स्वर्ग यात्रा निधीची सभासद संख्या वाढत असल्याचे दिसून येते. अल्पावधीत सुरु झालेल्या या उपक्रमात १ हजार ४९७ व्यक्तींची नोंदणी झाली. आतापर्यंत २ लाख ४४ हजार ८६० रुपये जमा झाले आहे. १५ सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने घरी जाऊन आर्थिक मदत देण्यात आली. सभासद संख्या वाढल्यानंतर १० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाºयांनी केला आहे. जाती व धर्माच्या पलीकडे जाऊन समधर्म समभाव जोपासत आधार संस्थेने सुरू केलेला उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घटकांचा विचार केला तर माणुसकीची चळवळ सुरू होते. आर्थिक फायदा व्हावा, यासाठी काही मंडळी धडपडत असताना दिसतात. ही संस्था यापासून कोसो दूर आहे. गरीब कुटुंबियांसाठी काही तरी देणे लागते, ही भावना संपत आहे. समाजातील लहान व गरजू व्यक्तीला आधार देणे तेवढेच गरजेचे आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर निर्माण होणारी आर्थिक अडचण आधार संस्थेच्या मदतीने काही प्रमाणात दूर होते. स्वर्ग यात्रा निधीच्या सदस्यांमध्ये वाढ होत आहे. सभासद संख्या वाढल्यास पुन्हा काही नव्या योजनांची सुरूवात केली जाणार आहे. ही संस्था प्रेरणादायी असून सर्वांनीच पाठबळ दिल्यास माणुसकीची प्रतिष्ठा वाढेल. याच कारणांमुळे शहरातील समाजातील जबाबदार घटक या संस्थेकडे आशावादी दृष्टीने बघत आहे.