शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

आधार संस्थेकडून मिळाला स्वर्गयात्रेला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:07 IST

मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संस्थेचे पदाधिकारी घरी जाऊन सांत्वन करून चार हजार रुपयांची मदत करतात.

ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : सांत्वनेसोबतच मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संस्थेचे पदाधिकारी घरी जाऊन सांत्वन करून चार हजार रुपयांची मदत करतात.मूल येथील संतोष रानगरवार, प्रशांत गटलेवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी आधार संस्थेची सामाजिक दृष्टिकोणातून स्थापन केली. आधार संस्थेअंतर्गत कुटुंबातील सर्व व्यक्तींकडून २२ रुपये सभासद शुल्क घेतल्या जाते. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना चार हजार रुपयांची मदत देऊन सांत्वना करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. जात आणि धर्माचा भेद न मानता सर्वांना समान मानल्याने स्वर्ग यात्रा निधीची सभासद संख्या वाढत असल्याचे दिसून येते. अल्पावधीत सुरु झालेल्या या उपक्रमात १ हजार ४९७ व्यक्तींची नोंदणी झाली. आतापर्यंत २ लाख ४४ हजार ८६० रुपये जमा झाले आहे. १५ सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने घरी जाऊन आर्थिक मदत देण्यात आली. सभासद संख्या वाढल्यानंतर १० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाºयांनी केला आहे. जाती व धर्माच्या पलीकडे जाऊन समधर्म समभाव जोपासत आधार संस्थेने सुरू केलेला उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घटकांचा विचार केला तर माणुसकीची चळवळ सुरू होते. आर्थिक फायदा व्हावा, यासाठी काही मंडळी धडपडत असताना दिसतात. ही संस्था यापासून कोसो दूर आहे. गरीब कुटुंबियांसाठी काही तरी देणे लागते, ही भावना संपत आहे. समाजातील लहान व गरजू व्यक्तीला आधार देणे तेवढेच गरजेचे आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर निर्माण होणारी आर्थिक अडचण आधार संस्थेच्या मदतीने काही प्रमाणात दूर होते. स्वर्ग यात्रा निधीच्या सदस्यांमध्ये वाढ होत आहे. सभासद संख्या वाढल्यास पुन्हा काही नव्या योजनांची सुरूवात केली जाणार आहे. ही संस्था प्रेरणादायी असून सर्वांनीच पाठबळ दिल्यास माणुसकीची प्रतिष्ठा वाढेल. याच कारणांमुळे शहरातील समाजातील जबाबदार घटक या संस्थेकडे आशावादी दृष्टीने बघत आहे.