शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याआधीच वरोऱ्यात पाणी प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:13 IST

शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देदोन दिवसांचा अल्टिमेटम : महिलांचा नगर परिषदेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.नगरसेविका चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन मुख्यधिकारी व नगराध्यक्ष अहतेशम अली यांना दिले. सदर मागण्या त्वरित मान्य न झाल्यास नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.वरोरा नगर परिषद ही शेकडो वर्ष जुनी असूनसुद्धा नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. नगर परिषदेत आजपर्यंत अनेक पक्षाच्या सत्ता बसल्या. मात्र नागरिकांच्या मुलभूत सुविधा अद्यापही मिळालेल्या नाही. काही प्रभागामध्ये उन्हाळा येण्याआधीच पाणी समस्येने डोके वर काढले असून खांजी वॉर्ड येथे मागील एक महिन्यापासून व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने थंडीच्या दिवसात नागरिकांचे घसे कोरडे पडले आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात पाणी टंचाईविरोधात नगर परिषदेवर एल्गार करीत शेकडो महिलांसह मोर्चा काढून मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, पाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख व नगराध्यक्ष अहतेशाम अली यांना निवेदन देवून समस्या सोडविण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा समस्येचे निराकरण न झाल्यास मटका फोड आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका चिमूरकर यांनी दिला.वरोरा क्षेत्रामध्ये सुरु झालेली पाणी पुरवठा योजना ही १९७४ सालची असल्याने आताचा वाढलेला शहराचा भाग व मागणी आणि पुरवठा याचा तुटवडा पडला असल्याने बºयाच ठिकाणी अशा अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे पाण्याची टाकी पूर्ण भरली जात नसल्याने बºयाच भागात पाणी फोर्सने जात नाही. त्यामुळे पाणी पोहचत नसल्याने ही अडचण येत आहेफ. पाणी पुरवठा एक दिवस आड दिल्याने सर्व भागात बरोबर पाणी मिळेल. यासाठी १ फेब्रुवारीपासून त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल.- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी.