शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

उन्हाळ्याआधीच वरोऱ्यात पाणी प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:13 IST

शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देदोन दिवसांचा अल्टिमेटम : महिलांचा नगर परिषदेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.नगरसेविका चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन मुख्यधिकारी व नगराध्यक्ष अहतेशम अली यांना दिले. सदर मागण्या त्वरित मान्य न झाल्यास नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.वरोरा नगर परिषद ही शेकडो वर्ष जुनी असूनसुद्धा नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. नगर परिषदेत आजपर्यंत अनेक पक्षाच्या सत्ता बसल्या. मात्र नागरिकांच्या मुलभूत सुविधा अद्यापही मिळालेल्या नाही. काही प्रभागामध्ये उन्हाळा येण्याआधीच पाणी समस्येने डोके वर काढले असून खांजी वॉर्ड येथे मागील एक महिन्यापासून व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने थंडीच्या दिवसात नागरिकांचे घसे कोरडे पडले आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात पाणी टंचाईविरोधात नगर परिषदेवर एल्गार करीत शेकडो महिलांसह मोर्चा काढून मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, पाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख व नगराध्यक्ष अहतेशाम अली यांना निवेदन देवून समस्या सोडविण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा समस्येचे निराकरण न झाल्यास मटका फोड आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका चिमूरकर यांनी दिला.वरोरा क्षेत्रामध्ये सुरु झालेली पाणी पुरवठा योजना ही १९७४ सालची असल्याने आताचा वाढलेला शहराचा भाग व मागणी आणि पुरवठा याचा तुटवडा पडला असल्याने बºयाच ठिकाणी अशा अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे पाण्याची टाकी पूर्ण भरली जात नसल्याने बºयाच भागात पाणी फोर्सने जात नाही. त्यामुळे पाणी पोहचत नसल्याने ही अडचण येत आहेफ. पाणी पुरवठा एक दिवस आड दिल्याने सर्व भागात बरोबर पाणी मिळेल. यासाठी १ फेब्रुवारीपासून त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल.- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी.