शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

उन्हाळी मूग पिकातही शेतकऱ्यांना निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला खरिपातील कापूस पिकाची लागवड केली होती. पीक चांगले भरले होते. परंतु ऐनवेळी बोंड अळीच्या ...

बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला खरिपातील कापूस पिकाची लागवड केली होती. पीक चांगले भरले होते. परंतु ऐनवेळी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने ते पीकही गेले. केलेला खर्चही गेला.

या खरिपातील केलेला खर्च बी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरांचा खर्च काढायचा कसा, या विचारात पळसगाव परिसरातील कळमना, आमडी, कवडजाई, किन्ही, कोर्टी, मानोरा, इटोली, दहेली येथील शेतकऱ्यांनी कापूस उपटून, धसकटे पेटवून चांगली मशागत करून उन्हाळी मुगाची बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करून लागवड केली. मुगाला दरवर्षी सात ते आठ हजारांपर्यंत भाव असतो. उत्पादन खर्चही कमी असतो. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग पिकाची लागवड केली. त्या मुगाला पेरणीच्या वेळी खत देण्यात आले. पाण्याच्या २ ते ३ पाळ्या देखील देण्यात आल्या. परंतु खर्चाच्या मानाने पहावे तसा मूग बहरला नाही.

काही ठिकाणी व्हायरसजन्य रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. मुगाला बघाव्या तशा शेंगा लागलेल्या दिसत नाही. कापूस व सोयाबीन सारखीच अवस्था मूग पिकाची झाली आहे. या पिकातून तरी आपला वार्षिक खर्च निघेल. डोक्यावरील कर्ज कमी होईल, या आशेने शेतकरी जगत होता. परंतु या पिकात देखील शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा भंग झाल्यागत स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी शेती करण्याकरिता खासगी बँकांकडून तर काहींनी सहकारी सोसायटीकडून कर्ज उचलले आहे. कापसाने ही शेतकऱ्यांना निराश केले. थोडी आशा मूग पिकाची होती पण त्यातही तोकडे उत्पादनच मिळेल, अशी अवस्था आहे. त्यामुळे पुढील हंगामात नेमक कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.