शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:45 IST

चंद्रपूरचे तापमाण राज्यात सर्वात जास्त असते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यांपासूनच मोठ्या प्रमाणात उन्ह तापायला लागले. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्ण लाटेचा प्रभाव अधिक असणार असल्याची घोषणा झाल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देबाहेर पडताना सावध राहा : प्रशासनाच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरचे तापमाण राज्यात सर्वात जास्त असते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यांपासूनच मोठ्या प्रमाणात उन्ह तापायला लागले. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्ण लाटेचा प्रभाव अधिक असणार असल्याची घोषणा झाल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.चंद्रपूर प्रदूषणामध्ये अव्वल असल्यासाठी कृप्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षीच चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात उष्णता असते. परिणामी अनेकजणाचा उष्मघाताने बळी होत असल्याची घटना आपल्याकडे घडल्या आहेत. त्यामुळे यावर्षी सदर प्रकार टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तीनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदींपासून उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करण्यात यावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे ओले कपडे यांचा वापर करावा, तसेच थंड पाण्याचे वेळोवेळी स्नान करावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी सकाळीच अधिक कामे उरकून घ्यावे, अशा सुचना करण्यात आल्या आहेत.उष्माघात ठरु शकतो धोकादायकउन्हाळ्यात अनेकांत उष्माघाताची लक्षणे आढळून येतात. हे धोकादायक ठरु शकते. चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी, उलटी होणे अशी उष्मघाताची लक्षणे आहेत. त्यामुळे उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, पाणी पिण्यापूर्वी थंड पाण्याने हातपाय धुवावे, त्यानंतर थोड्या वेळानी पाणी प्यावे, शक्ततो लिंबूपाणी प्यावे, तसेच उन्हाळ्यात सर्वाधिक त्वेचेचे आजार जाणवतात. हे आजार टाळण्यासाठी उन्हात जाणे टाळावे, शक्यतो ‘सनकोट’ घालूनच बाहेर पडावे, तोंडाची त्वचा उघडी अल्यामुळे धूळ आणि उन्हाचा परिणाम होतो. त्यामुळे बाहेर पडताना चेहऱ्याला स्कार्फ बांधावा, टोपीचा वापर करावा, बाहेर जाण्यापूर्वी सनलोशन लावायचे असल्यजास ४५ मिनिटेपूर्वी लावावे.