शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिला बनणार मनोधैर्य योजनेतून सक्षम

By admin | Updated: January 25, 2017 00:47 IST

बलात्कार, बालकावरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनवर्सन करुन..

शासनाचे क्रांतिकारी पाऊल : तीन लाखांपर्यंत अर्थसहाय्यचिमूर : बलात्कार, बालकावरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनवर्सन करुन त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने ‘मनोधैर्य योजना’ कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या सहाय्याने या पीडित महिलांना सक्षम बनण्यास मदत होणार आहे.या योजनेतून पीडितांना किमान दोन ते तीन लाखापर्यंतची आर्थिक मदत देण्याची तरतुद केली आहे. पीडित महिलेला सर्व शक्तीनिसी आधार देवून तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देवून तिला सन्मानाने उभे करण्यासाठी मनोधैर्य योजना शासनाचे क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखले जात आहे. बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला, बालके व त्यांच्या वारसदारांना तातडीने आर्थिक मदत आणि मानसोपचाराची सेवा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना गरजेनुसार निवारा शिक्षण व व्यावसायीक प्रशिक्षण या सारख्या आधार सेवा उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.या योजने अंतर्गत बलात्कार व बालकावर लैगिंक अत्याचार प्रकरणी दोन लाख रुपये व विशेष प्रकरणामध्ये कमाल तीन लाख रूपयाचे अर्थसहाय्य देण्याची तरतुद आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास अंधत्व आल्यास, त्यांचा चेहरा विद्रुप झाला अथवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये आणि अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांना ५० हजार रुपये इतक्या अर्थसहाय्यायची तरतुद या योजनेत करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत या योजनेनुसार अर्थसहाय्य देण्याची तरतुद आहे. या योजनेमुळे समाजात विकृत मानसीकतेला बळी पडलेल्या महिलांना नव्याने समाजात सक्षण होण्यास मदत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)