शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

चंद्रपुरात अचानक उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

मागील सव्वा महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. चंद्रपुरातही नागरिक लॉकडाऊन पाळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. या लॉकडाऊनदरम्यान दररोज काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता घराबाहेर पडतात. मात्र ही संख्या मोठी नसते. शिवाय सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहत असल्याने दुपारनंतर चंद्रपुरातील रस्त ओस असतात.

ठळक मुद्देलॉकडाऊनचे तीनतेरा : चंद्रपूरकरांना झालंय तरी काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचे प्रत्येक गावात पालन होत आहे. चंद्रपुरातही लॉकडाऊन उत्तम पाळला जात आहे. मात्र अचानक सोमवारी हजारो नागरिक वाहने घेऊन रस्त्यावर आली आणि लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. जटपुरा गेटवर तर चारचाकी आणि दुकाकी वाहनांची लांबच लांब राग लागली होती. चंद्रपूरकरांची ही कृती निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरली.मागील सव्वा महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. चंद्रपुरातही नागरिक लॉकडाऊन पाळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. या लॉकडाऊनदरम्यान दररोज काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता घराबाहेर पडतात. मात्र ही संख्या मोठी नसते. शिवाय सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहत असल्याने दुपारनंतर चंद्रपुरातील रस्त ओस असतात. मात्र सोमवारी अचानक चंद्रपूरकरांनी सर्व नियमांची पायमल्ली केल्याचे आढळून आले. अचानक हजारो नागरिक आपापली वाहने घेऊन रस्त्यावर आली. जटपुरा गेटवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहत आहे. त्यामुळे शेकडो वाहनांची रांग जटपुरा गेटवर दिसून आली. नागरिकांची एवढी मोठी संख्या बघून पोलीसही चक्रावले. अखेर एक एक वाहनांची पोलिसांनी कसून चौकशी केली. ज्यांच्याकडे पास होते, त्यांना सोडण्यात आले आणि ज्यांच्याकडे कुठलेही पास आढळून आले नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, पास नसणाऱ्यांची संख्या अधिक होती, असे पोलीस सुत्राने सांगितले.नेमकी किती जणांवर कारवाई केली, याबाबतचा आकडा मंगळवारी माहिती होणार आहे.अतिरिक्त एसपींकडून तपासणीचंद्रपुरात सोमवारी अचानक बहुसंख्य नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर आल्याने याची गंभीर दखल अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घेतली. ते स्वत: ताफ्यासह जटपुरा गेटवर पोहचले. त्यांनीदेखील जटपुरा गेटवर स्वत: अनेक वाहनांची तपासणी करीत विनाकारण घराबाहेर पडणाºया नागरिकांवर कारवाई केली.मनपाचे पास मिळताच नागरिक रस्त्यावरमागील काही दिवसांपासून महानगरपालिकेद्वारे नागरिकांना बाजारपेठेत येण्यासाठी पास वितरित करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश जणांना अशा पास मिळाल्या आहेत. यात कुटुंबप्रमुख आणि इतर दुसरा व्यक्ती यांचे नाव असून त्यांनाच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडता येते. मात्र एकाच दिवशी सर्व नागरिक बाहेर पडू नये म्हणून महानगरपालिकेने प्रत्येक कुटुंबाला आठवड्यात एक दिवस घराबाहेर पडण्यासाठी निश्चित करून दिला आहे. मात्र बहुतांश नागरिकांनी पासमधील दिवस बघितला नसेल आणि पास घेऊन घराबाहेर पडले असेल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या