शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

असा अधिकारी दुर्मिळच, शेकडो राख्यांचे पाकिट पोहचले प्रशासकीय कार्यालयात

By साईनाथ कुचनकार | Updated: August 30, 2022 23:48 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र अनेकवेळा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहचतच नाही किंवा काही कारणांमुळे त्याचा लाभ मिळत नाही.

चंद्रपूर : पोस्टमन येतो पत्रांचे ढीग पुढे करतो आणि निघून जातो. एक पाकिट उघडले जाते. त्यामध्ये राखी असते. पुढचे पाकिट पुन्हा राखीचेच. असेच एक दोन दिवस नाही तर संपूर्ण आठवडाभर पोस्टमन पाकिट घेऊन येतो आणि यामध्ये फक्त राखीच बघायला मिळते. यामुळे संपूर्ण कार्यालय आश्चर्यचकीत होते. हे दृश्य कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयातील नसून ते येथील प्रशासकीय कार्यालयातील आहे.ऐरवी प्रशासन म्हणजे, सरकारी खाक्या अशी काहीशी मानसिकता झाली आहे. मात्र यातच सुखद धक्का देण्याऱ्या काही गोष्टीही घडतात. अशी राख्यांची गोष्ट येथील उपविभागीय कार्यालयात घडली. तरुण असलेले सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे या भाऊरायांसाठी जिल्ह्यातील विशेषत: चंद्रपूर प्रकल्पातील आदिवासी समाजातील एक दोन नाही तर शेकडो बहिणींनी त्यांना राखी पाठवूल खऱ्या अर्थाने भाऊ-बहिणींचे नाते जपले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र अनेकवेळा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहचतच नाही किंवा काही कारणांमुळे त्याचा लाभ मिळत नाही. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून घुगे यांनी पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी दुर्गम भागातील आदिवासींना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. विशेषत: त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहे. एवढेच नाही तर अधिकारी आणि नागरिक यांच्यातील दरी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातूनच दुर्गम भागातील नागरिकांसोबत त्यांची नाड जुडली. यातूनच गावागावात शेकडो बहिणी त्यांच्या पाठीशी आहेत. मानलेले का असेना पण भाऊ-बहिणींचे नाते कायम राहावे, यासाठी चंद्रपूर प्रकल्पातील अनेक गावातील बहिणींनी त्यांना राख्या पाठवून भाऊ-बहिणींचे प्रेम वृद्धींगत केले आहे.

प्रशासकीय काम करताना अनेकांसोबत संपर्क येतो. यातून जिल्ह्यातील अनेक बहिणींनी राखी पाठवून केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने कामाची पोहच दिली आहे. आदिवासी बहिणींनी पाठविलेल्या या राख्यांतून बहिणी भावाचे हे नाते अधिक घट्ट केले आहे.-रोहन घुगेसहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, कार्यालय, चंद्रपूर 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरRaksha Bandhanरक्षाबंधनTrible Development Schemeआदिवासी विकास योजना