शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

गटशेतीतून कृषी विकासाचा प्रयोग यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:41 IST

गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आनंदवन येथे गटशेती समूहांचे प्रशिक्षण, अनेकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे.यावेळी डॉ. विकास आमटे, माजी आमदार संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, वरोरा प.स. सभापती रोहिणी देवतळे, राहुल सराफ, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, नरेंद्र जीवतोडे, उपविभागीय अधिकारी (कृषि) राजवाडे, पाटील, गौतम करार, पोतदार, महारोगी सेवा समिती संचालक कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.ना. अहीर पुढे म्हणाले, सबका साथ, सबका विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. तर गटशेतीच्या माध्यमातून त्याला प्रतिसाद म्हणून समूह शेती, समूह विकास हा आहे. आपला देश कृषि प्रधान आहे, असे आपण म्हणत असलो तरी मागील सरकारच्या काळात अन्नधान्य आयात करावे लागत होते तर या सरकारच्या काळात अन्नधान्य निर्यात करू लागलो हे मोठे यश आहे. रस्ते विकासाकरिता सीआरएफ फंडप्रमाणे कृषि सिंचनाकरिता निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी आपण मागील सरकारकडे केली होती. परंतु नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्याबरोबर पहिल्यांदा देशात प्रधानमंत्री कृषि सिंचनावर तरतू करण्यात आली आहे. याचा अर्थ हे सरकार कृषि पोषक सरकार आहे, हेच सिध्द होते. गटशेतीच्या माध्यमातून अन्नधान्य, प्रोसेसिंग व मार्केटींग हे सर्व उपक्रम राबविण्याची तरतूद असून शेतकरी गट शेती व्यापारात समोर आल्यास हे एक पुरोगामी पाऊल ठरेल. रसायनमुक्त अन्नधान्याची गरज जगात असून त्याकरिता जादा किंमत जग मोजण्यास तयार आहे व निर्यातीस मोठा वाव आहे. या संधीचा उपयोग शेतकऱ्यांनी करण्यासाठी गट शेती करणाऱ्या समुहानी समोर येण्याचे आवाहन ना. अहीर यांनी केले.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, सहनशील आहे म्हणूनच सरकारे टिकून आहेत, असे मत नोंदवून ना. अहीर म्हणाले की, यापुढे देशात पुल वजा बंधारे बांधण्याचे धोरण ना. नितीन गडकरी यांनी निश्चित केल्याने देशाची सिंचन क्षमता वाढणार आहे.आनंदवन हे यापुढे शेती प्रयोगाची पंढरी होणार असून गट शेतीच्या शेतकरी समूहासाठी ते प्रेरणास्थान राहणार आहे. आनंदवन समूह गटशेती शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे समाधान असल्याचे मत ना. अहीर यांनी नोंदविले. या प्रशिक्षणात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा व अमरावती येथून एकूण १३ गट उपस्थित होते. तर त्यांच्या माध्यमातून जवळपास तीनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.