शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 4, 2017 00:42 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमाणात आणण्यासाठी व आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थगिती व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली.

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमाणात आणण्यासाठी व आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थगिती व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली. परंतु, शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शैक्षणिक सत्र संपून दुसरे सत्र सुरु झाले असतानासुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.आदिवासी मुले शाळाबाह्य राहू नये. शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी विविध योजना राबवित आहे. त्यासाठीच आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सूवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना आदिवासी विभागातंर्गत लागू करण्यात आली. या शिष्यवृत्तीमुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येण्यास मदत होईल. व शिक्षणात त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी होईल, असा मुख्य उद्देश आहे. मात्र, शैक्षणिक सत्र संपूर्ण दुसरे सत्र सुरु होत असतानासुद्धा शिक्षण विभगाच्या दिरंगाईमुळे अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये सदर शिष्यवृत्ती जमा करण्यात आली नाही. मागील सत्रात संबंधीत शिष्यवृत्ती आॅनलाईन केल्याने सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन आदिवासी विभागाने धनादेशासहीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे दिले. परंतु या बाबीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शैक्षणिक सत्र संपूनही दुसरे सत्र सुरु झाल्यानंतरही शिष्यवृत्ती मिळत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे. पूर्वी विद्यार्थ्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाच्या खात्यावर सूवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती जमा करुन त्याचे वितरण केले जात होते. परंतु, यावर्षीपासून आॅनलाईन शिष्यवृत्ती केल्याने समस्या निर्माण झाली असून बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यास शिक्षण विभाग दिरंगाई दाखवत आहे. मागील सत्रात प्राथमिक शिक्षक संघाने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात यावे, ही मागणी लावून धरली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत शिष्यवृत्ती जमा करण्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी हमी दिली होती. परंतु तालुक्यातील विद्यार्थी बँकेमध्ये वारंवार फेरफटका मारत आहे. शिष्यवृत्ती जमा न झाल्याने रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)