शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 4, 2017 00:42 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमाणात आणण्यासाठी व आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थगिती व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली.

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमाणात आणण्यासाठी व आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थगिती व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली. परंतु, शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शैक्षणिक सत्र संपून दुसरे सत्र सुरु झाले असतानासुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.आदिवासी मुले शाळाबाह्य राहू नये. शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी विविध योजना राबवित आहे. त्यासाठीच आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सूवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना आदिवासी विभागातंर्गत लागू करण्यात आली. या शिष्यवृत्तीमुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येण्यास मदत होईल. व शिक्षणात त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी होईल, असा मुख्य उद्देश आहे. मात्र, शैक्षणिक सत्र संपूर्ण दुसरे सत्र सुरु होत असतानासुद्धा शिक्षण विभगाच्या दिरंगाईमुळे अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये सदर शिष्यवृत्ती जमा करण्यात आली नाही. मागील सत्रात संबंधीत शिष्यवृत्ती आॅनलाईन केल्याने सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन आदिवासी विभागाने धनादेशासहीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे दिले. परंतु या बाबीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शैक्षणिक सत्र संपूनही दुसरे सत्र सुरु झाल्यानंतरही शिष्यवृत्ती मिळत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे. पूर्वी विद्यार्थ्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाच्या खात्यावर सूवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती जमा करुन त्याचे वितरण केले जात होते. परंतु, यावर्षीपासून आॅनलाईन शिष्यवृत्ती केल्याने समस्या निर्माण झाली असून बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यास शिक्षण विभाग दिरंगाई दाखवत आहे. मागील सत्रात प्राथमिक शिक्षक संघाने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात यावे, ही मागणी लावून धरली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत शिष्यवृत्ती जमा करण्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी हमी दिली होती. परंतु तालुक्यातील विद्यार्थी बँकेमध्ये वारंवार फेरफटका मारत आहे. शिष्यवृत्ती जमा न झाल्याने रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)