शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपस्थिती भत्त्यापासून राज्यातील विद्यार्थिंनी राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:41 IST

यावर्षी मार्च महिन्यापासून शाळाच बंद असल्याने विद्यार्थिंनींना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

ठळक मुद्दे राज्य शासनाने १९९२ मध्ये सुरु केली योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिंनीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी १९९२ मध्ये राज्य सरकारने अनुसुचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विद्यार्थिंनीना प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले. मात्र यावर्षी मार्च महिन्यापासून शाळाच बंद असल्याने या विद्यार्थिंनींना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

तीन दशकांपूर्वी राज्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थिंनीचे उपस्थिती प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे राज्य शासनाने १९९२ मध्ये इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थिंनींसाठी प्रतिदिवस एक रुपया प्रमाणे अनुदान देण्याची योजना सुरु केली. यासाठी संबंधित विद्यार्थिंनींना शाळा सुरु असलेल्या दिवसाच्या ७५ टक्के उपस्थित राहणे अनिर्वाय करण्यात आले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शाळांतील मुलींच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले. दरम्यान, यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासूनच शाळांना सुटी देण्यात आली. त्यातच नवे शैक्षणिक सत्र सुरु होऊनही अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. त्यामुळे विद्यार्थिंनींच्या प्रोत्साहन भत्त्याचे काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.महागाई वाढली, मात्र भत्ता जैसे थेतत्कालीन राज्य सरकारने दुर्बल घटकातील विद्यार्थिंनींची शाळेत उपस्थिती वाढविण्यासाठी ही योजना सुरु केली होती. यासाठी प्रतिदिवस विद्यार्थिंनींना एक रुपया दिला जातो. या योजनेला तीन दशकाचा कालावधी लोटला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढली आहे. मात्र दिला जाणारा भत्ता जैसे थै आहे. एक तर भत्ता वाढवून द्यावा किंवा योजनाच बंद करून टाकावी, असे मतही पालक व्यक्त करीत आहेत.शिक्षकांनाही मनस्तापदुर्बल घटकातील विद्यार्थिंनींना प्रतिदिवस उपस्थिती भत्ता एक रुपया दिला जातो. मात्र शिक्षकांना प्रत्येक महिन्यातील विद्यार्थिंनींची ७५ टक्के उपस्थिती वरिष्ठांकडे पाठवावी लागत आहे. यामुळे दरमहिन्यातील या कामामुळे आता शिक्षकही त्रासले आहे.विद्यार्थिंनींची शाळांत उपस्थिती वाढविण्यासाठी शासनाची योजना चांगली आहे. मात्र महागाई बघता त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शाळा बंद असल्याने भत्ता देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेऊन लाभ द्यावा.-जे.टी.पोटेशिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र