शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी म्हणतात... बस्स झाले, आता लालपरी हवीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST

विकास खोब्रागडे पळसगाव (पिपर्डा) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेले अनेक दिवस बंद असणाऱ्या बहुतांश शाळा सुरू झाल्या खऱ्या, ...

विकास खोब्रागडे

पळसगाव (पिपर्डा) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेले अनेक दिवस बंद असणाऱ्या बहुतांश शाळा सुरू झाल्या खऱ्या, पण तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस लवकर उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. एसटी सेवा सुरू नसल्याने शाळेपर्यंत जायचे कसे, या चिंतेत विद्यार्थी आणि पालक सापडले आहेत.

दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला. तरी बरेच विद्यार्थी अजून घरीच आहेत. त्यामुळे एसटीअभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी गावागावांत शाळा आहेत. पण माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून सुमारे २२ ते २५ किलोमीटर दूर शहरातील किंवा परिसरातील मोठ्या गावात जावे लागते. यासाठी विद्यार्थी सुरक्षित आणि सवलतीची म्हणून शासनाच्या एसटी सेवेचा लाभ घेतात. तसेच पाचवी ते बारावीपर्यंत शासनाने सावित्रीबाई फुले मोफत पास योजना मुलींसाठी लागू केली आहे. मुलांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध करून दिला जातो.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वच गावात, शहरात शाळा सुरू केल्या आहेत. पण पळसगाव पिपर्डा, गोंडमोहाळी,पारणा व बऱ्याच ठिकाणी एसटी बस सुरू न केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे. गावापासून लांब असणाऱ्या शाळेत जायचे कसे, हा प्रश्न भेडसावत आहे. एसटी बस सुरू नसल्याने काही पालक आपल्या पाल्याला सोडण्यासाठी जात आहेत, तर काही ठिकाणी खासगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन मुले शाळेत जात आहेत.

त्यामुळे चिमूर तालुक्यातील पळसगाव सिंदेवाहीमार्गे एसटी सेवा सुरू करा, अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया जेव्हा पळसगाव येथे रक्षबांधन कार्यक्रमाला आले होते, तेव्हा गावकऱ्यांनी केली होती. त्यावेळी आठ दिवसांत बस चालू होणार, असे आश्वासन आमदारांनी दिले होते. मात्र अजूनही बस सुरू न झाल्याने आमदारांचे आश्वासनही हवेत विरल्यागत दिसत आहे.

बॉक्स

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा

एसटी बस सुरू होण्यास पळसगाव पिपर्डा येथील पुलाचा अडथळा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावरच ही समस्या उद्भवते. असले तरी त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान का, असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

170921\screenshot_2021-09-17-09-39-14-96.jpg

ग्रामीण भागातील विद्यार्थी लाल परीच्या प्रतीक्षेत