सावली : रमाबाई आंबेडकर विद्यालय व विश्वशांती विद्यालय सावली या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी बससाठी आंदोलन करुन सुमारे दोन तास वाहतूक अडवून ठेवली. त्यामुळे चालक-वाहकांला नाईलाजाने बस उभी ठेवावी लागली.मानव विकास योजने अंतर्गत तत्कालिन शासनाने विद्यार्थ्यांसाठी एस.टी. महामंडळांतर्गत बस सुरू केली. परंतु, अधिकारी व चालक- वाहकाच्या अडेलतडू धोरणामुळे विद्यार्थ्यांसाठी सामान्य प्रवाशांची ने आण करण्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागत होते. सावली परिसरातील गावांमधील अनेक विद्यार्थी दोन्ही शाळांमध्ये विद्यार्जनासाठी येतात. परंतु शाळा सुटल्यानंतर परत जाताना त्यांच्या वेळेवर एकही बस उपलब्ध नाही. सुट्टी झाल्यानंतर एकमेव बस उपलब्ध असल्यामुळे त्या बसमध्ये सामान्य प्रवाशी बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जागा राहात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. परिणामी सततची पायपीट आणि होणाऱ्या त्रासामुळे दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी अखेर बस अडवून आंदोलन केले. ५.१५ च्या एस.टी. बस नंतर महामंडळाकडून कोणतीही एस.टी. प्रवाशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने शाळकरी विद्यार्थ्यांनी बस अडवून आंदोलनाचा केले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचे आंदोलन
By admin | Updated: August 12, 2015 00:49 IST