शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

मुख्याध्यापकाच्या ‘दांडी’मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By admin | Updated: August 27, 2015 01:18 IST

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दमपूर मोहदा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे या-ना त्या कारणाने वारंवार आजारी रजेवर जात असल्याची ओरड...

तब्बल तीन महिने आजारी रजा : अधिकाऱ्याकडून मुख्याध्यापकाची पाठराखणचंद्रपूर: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दमपूर मोहदा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे या-ना त्या कारणाने वारंवार आजारी रजेवर जात असल्याची ओरड गावकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे शाळेची प्रशासकीय व शैक्षणिक कामे वारंवार खोळंबून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील शैक्षणिक सत्रात शौचालय बांधकामासाठी शासनाकडून ९५ हजार चा निधी प्राप्त झाला होता. परंतु त्यांनी शौचालय बांधकाम पूर्ण न करता निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. याप्रकरणात केंद्र प्रमुख व संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे कळते. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. षटकोनी इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्याची आतापर्यंत कुठलीही डागडूजी झालेली नाही. तरीसुद्धा त्याच इमारतीत वर्ग बसवण्याचे तोंडी आदेश मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुखांनी शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळेतील संगणक कक्षाची अतिशय दुरावस्था झाली आहे. संगणक बंद स्थितीत असून धूळ खात पडून आहेत. मुख्याध्यापकांनी संगणक दुरुस्तीची कुठलीही तसदी घेतली नाही. मुलांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नाही. शालेय पोषण आहाराचा दर्जा पूर्णपणे घसरला आहे. जेवणात भाजीपाल्याचा अजिबात पत्ता नसतो.साठा नोंदवहीत खूप मोठी तफावत असल्याची माहिती आहे. तसेच शालेय अभिलेखे शाळेत न ठेवता स्वत:च्या घरी ठेवतात. शैक्षणिक साहित्य निर्मिती अनुदान गेल्या पाच वर्षापासून शिक्षकांना वाटप केलेले नाही. मागील सत्रात दोन विद्यार्थ्यांच्या बनावट स्वाक्षरी करुन आदिवासी शिष्यवृत्ती हडप करण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष पसरलेला आहे.सदर मुख्याध्यापक मागील शैक्षणिक सत्रात शाळेच्या सुरुवातीलाच म्हणजे ३० जून २०१४ ते ४ आॅगस्ट २०१४ पर्यंत आजारी रजेवर होते. त्यानंतर त्याच सत्रात १५ डिसेंबर २०१४ ते ६ मे २०१५ पर्यंत तब्बल सात महिने आजारी रजेवर होते. ते ७ मे २०१५ म्हणजेच सत्राच्या शेवटच्या दिवशी शाळेत स्वत:हून हजेरी पटावर स्वाक्षरी करुन रुजू झाले. यावरून ते कामचुकारपणा करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. तरीसुद्धा त्यांच्या सेवा पुस्तकात आठ महिन्यांच्या अर्जीत रजा शिल्लक नसतानाहीसुद्धा त्यांच्या आजारी रजा कालावधीतील वेतन बील काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे पाणी नक्कीच कुठेतरी मुरले, असा नागरिकांना संशय येत आहे. त्यामुळे सदर मुख्याध्यापकाची जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर चौकशी व्हावी, यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांच्यावर तडका- फडकी बदली करण्यात यावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)