शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थी जिल्हा कचेरीवर धडकले

By admin | Updated: September 18, 2016 00:55 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासन नानाविध योजना राबवित असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे.

कंत्राटदाराचा मनमानी कारभार : दिले जात आहे निकृष्ट आणि अपुरे जेवण चंद्रपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासन नानाविध योजना राबवित असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे. पोटभर आणि विद्यार्थ्यांनी ठरविलेला मेनू जेवणात द्यावाच लागेल, असा शासकीय नियम असतानाही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट आणि अपुरे जेवण दिले जात आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी काल शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.येथील समाजकल्याण विभाग कंत्राटदाराच्या मदतीने सध्या वरणभात नावाचा उपक्रम राबवित असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सर्व नियम सबंधित कंत्राटदार पायदळी तुडवित आहे. विद्यार्थ्यांना पुरेसे अन्नही देत नाही. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.समाजकल्याण विभागाचे येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. जिल्हाभरातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्टया कमकुवत विद्यार्थी येथे राहतात. प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे येथे एकूूण ६५ विद्यार्थी आहेत. या वसतिगृहातील खानावळीचे कंत्राट अग्रवाल नामक व्यक्तीला मिळाले आहे. मागील दोन वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नियमानुसार विद्यार्थी आणि कंत्राटदार मिळून मेनू सांगतात. तो सर्वसंमतीने ठरल्यानंतर तो द्यावाच लागतो. परंतु कंत्राटदार मनात येईल तसे जेवण विद्यार्थ्यांना देतो. याची तक्रार केली तर कंत्राटदाराकडून दमदाटी केली जाते. त्यामुळे आजपर्यंत प्रकरण वसतिगृहाच्या बाहेर आले नव्हते. मात्र अखेर विद्यार्थ्यांचा राग गुरुवारी रात्री अनावर झाला. कंत्राटदाराने विद्यार्थ्यांना केवळ वरण आणि भातच खायला दिले. विद्यार्थ्यांनी खाण्यास नकार दिला. संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सूचना केल्या. त्यानंतर रात्री दीड वाजता विद्यार्थ्यांना जेवण मिळाले. दरम्यान नेहमीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.गृहपाल रात्री उपस्थित नसतातया वसतिगृहात गृहपाल म्हणून महिला आहे. त्या सध्या प्रसूती रजेवर आहेत. त्यांच्या जागी वरोरा येथील एकाची प्रभारी गृहपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेही रात्री उपस्थित नसतात, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.