शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

विद्यार्थी मूलच्या बसस्थानकावर रात्री ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:29 IST

मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली.

ठळक मुद्देबस आलीच नाही : नियंत्रकांचा खासगी बसने जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली. सायंकाळी ५ वाजता बसस्थानकावर आलेल्या विद्यार्थ्यांना रात्री १० वाजता दुसºया बसची सोय उपलब्ध झाल्यानंतर परतीचा प्रवास करावा लागला. बसस्थानकावर असलेल्या नियंत्रकांनी मात्र विद्यार्थ्यांना यादरम्यान, खाजगी बसने जाण्याचा सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप विद्यार्थी व प्रवाशांनी केला आहे.राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या या मतदार संघात विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी सतत तत्परता दाखविली जाते. असे असताना एस.टी. महामंडळाच्या कर्मचाºयांच्या हेकेखोर प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना २८ आॅगस्टला त्रास सहन करावा लागला. मूल तालुक्यातून टेकाडी गावाजवळ येणाºया बसमध्ये बिघाड झाल्याने बस आली नाही. इयत्ता ११ व १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी बसची वाट बघत होते. सायंकाळ झाली तरी बस न आल्याने विद्यार्थी चांगलेच वैतागून गेले. याबाबत बसस्थानकावर कामावर असलेल्या नियंत्रकांना विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याचे काम केले. त्यानंतर विद्यार्थी व प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन याबाबत चंद्रपूर आगाराला कळविण्यात आले. दोन तासानंतर बस येईल, त्यानंतर गावाकडे जाता येईल, असे सांगण्यात आले. मात्र रात्री १० वाजता विद्यार्थ्यांसाठी बस आली आणि विद्यार्थी घरी परतले. विशेष म्हणजे, यावेळी बसस्थानकावर एक बस उपलब्ध असल्याने तीच बस येरगाव, पिपरी दीक्षित गावाकडे पाठविण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली. मात्र कर्मचारी नसल्याचा बहाना करुन विद्यार्थी व पालकांना हुलकावनी देण्यात आली. बस उपलब्ध असताना कर्मचाºयांचा बहाना करुन विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रकार अशोभनिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मानव विकास मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाने एसटी महामंडळाला बसेस पुरविल्या. मात्र ज्याच्यासाठी बसेस आहेत, त्यांनाच ताटकळत राहावे लागते, ही फार मोठी शोकांतिका असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.बसविषयी बसस्थानकावर असलेल्या नियंत्रकांना विचारणा केली असता विद्यार्थी व प्रवाशांनी खाजगी बसेसनी जावे. याबाबत आपण काहीच करु शकत नाही, असे बोलून त्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर चंद्रपूरला याबाबत कळविले. दोन तासांनी बस येईल, असे सांगण्यात आले. रात्री जवळपास १० वाजता बसची व्यवस्था झाली.- ताराचंद नागापूरे माजी सरपंच येरगाव