शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मूलच्या बसस्थानकावर रात्री ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:29 IST

मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली.

ठळक मुद्देबस आलीच नाही : नियंत्रकांचा खासगी बसने जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली. सायंकाळी ५ वाजता बसस्थानकावर आलेल्या विद्यार्थ्यांना रात्री १० वाजता दुसºया बसची सोय उपलब्ध झाल्यानंतर परतीचा प्रवास करावा लागला. बसस्थानकावर असलेल्या नियंत्रकांनी मात्र विद्यार्थ्यांना यादरम्यान, खाजगी बसने जाण्याचा सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप विद्यार्थी व प्रवाशांनी केला आहे.राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या या मतदार संघात विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी सतत तत्परता दाखविली जाते. असे असताना एस.टी. महामंडळाच्या कर्मचाºयांच्या हेकेखोर प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना २८ आॅगस्टला त्रास सहन करावा लागला. मूल तालुक्यातून टेकाडी गावाजवळ येणाºया बसमध्ये बिघाड झाल्याने बस आली नाही. इयत्ता ११ व १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी बसची वाट बघत होते. सायंकाळ झाली तरी बस न आल्याने विद्यार्थी चांगलेच वैतागून गेले. याबाबत बसस्थानकावर कामावर असलेल्या नियंत्रकांना विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याचे काम केले. त्यानंतर विद्यार्थी व प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन याबाबत चंद्रपूर आगाराला कळविण्यात आले. दोन तासानंतर बस येईल, त्यानंतर गावाकडे जाता येईल, असे सांगण्यात आले. मात्र रात्री १० वाजता विद्यार्थ्यांसाठी बस आली आणि विद्यार्थी घरी परतले. विशेष म्हणजे, यावेळी बसस्थानकावर एक बस उपलब्ध असल्याने तीच बस येरगाव, पिपरी दीक्षित गावाकडे पाठविण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली. मात्र कर्मचारी नसल्याचा बहाना करुन विद्यार्थी व पालकांना हुलकावनी देण्यात आली. बस उपलब्ध असताना कर्मचाºयांचा बहाना करुन विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रकार अशोभनिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मानव विकास मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाने एसटी महामंडळाला बसेस पुरविल्या. मात्र ज्याच्यासाठी बसेस आहेत, त्यांनाच ताटकळत राहावे लागते, ही फार मोठी शोकांतिका असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.बसविषयी बसस्थानकावर असलेल्या नियंत्रकांना विचारणा केली असता विद्यार्थी व प्रवाशांनी खाजगी बसेसनी जावे. याबाबत आपण काहीच करु शकत नाही, असे बोलून त्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर चंद्रपूरला याबाबत कळविले. दोन तासांनी बस येईल, असे सांगण्यात आले. रात्री जवळपास १० वाजता बसची व्यवस्था झाली.- ताराचंद नागापूरे माजी सरपंच येरगाव