शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

विद्यार्थ्यांची गणवेशधारी सेवेला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:34 IST

राजेश मडावी। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करता यावे, ...

ठळक मुद्देदहावीचा कलचाचणी निकाल जाहीर : वाणिज्य शाखेला दिले द्वितीय प्राधान्य

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करता यावे, या हेतुने राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (विद्या प्राधिकरण) ने राज्यस्तरावर एकाच दिवशी कलचाचणी घेण्यात आली होती. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानुसार जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणवेशधारी शासकीय सेवेला पहिली पसंत दिली तर वाणिज्य शाखेला द्बितीय प्राधान्य दिल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेऊन यासंदर्भात मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आवडीच्या क्षेत्राची अभ्यासशाखा निवडून भविष्यात उत्तम करिअर करता यावे, याकरिता राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळ, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (विद्या प्राधिकरण) कडून विविध कसोट्या तयार करण्यात आल्या होत्या. व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करणे, विद्यार्थी व पालकांना या क्षेत्रांची माहिती देऊन जागृती करणे हा कलचाचणीचा मुख्य हेतु आहे. ही परीक्षा आॅनलाईन संगणक प्रणालीद्वारे घेण्यात आली. आॅफलाईन पद्धतीने कलचाचणी घेण्याकरिता राज्य मंडळाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली होती. राज्यामध्ये १६ लाख १३ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी हे कल चाचणी दिली. नागपूर विभागात १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थी कलचाचणीला सामोरे गेले. यामध्ये जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. कलचाचणीचा निकाल शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने जाहीर केला. या निकालानुसार जिल्ह्यातील दहावीच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सरकारी सेवेला पहिली पसंती दिली. वाणिज्य शाखेला दुसरे प्राधान्य दिले. कला, मानवविद्या, आरोग्य, जैविक शिक्षण हे पर्यायदेखील विद्यार्थ्यांपुढे ठेवण्यात आले होते. पण, सरकारी नोकरीकडेच विद्यार्थ्यांचा कल दिसून आला. कलचाचणीतील निष्कर्ष शिक्षक व पालकांनाही अंर्तमुख करणारे आहेत.विद्यार्थिनींचा ओढा आरोग्य शिक्षणाकडेजिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थिनींनी आरोग्य व जैविक शिक्षणाला सर्वाधिक पसंती दर्शविल्याचे निकाल सांगतो. याशिवाय मानवविद्या अभ्यासशाखाही विद्यार्थिनींना आवडत असल्याचे निकालातून दिसून आले.शुक्रवारपासून मिळणार निकाल प्रतशालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या कलचाचणी निकालाची छापील प्रत विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाकडून २२ मार्च २०१९ पासून मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली. याची नोंद यामध्ये करण्यात आली आहे.कला, संस्कृतीचीही आवडशैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यासाठी देण्यात आलेल्या पर्यायामध्ये २० टक्के विद्यार्थ्यांनी ललित कलांना पसंती दिली. कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्राविषयी आवड निर्माण होत असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.उपाययोजनांचे काय?शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीत आज प्रचंड बदल झाला आहे. विद्यार्थ्यांवर सोशल मीडियाद्वारे माहितीचा मारा होत आहे. यातून विधायक आणि विघातक कोणते, याची निवड करताना विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याचा धोका आहे. व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असला तरी शासकीय नोकरी हेच प्रमुख आकर्षण त्यांच्यापुढे आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी समुपदेशक व शिक्षकांची मोठी कसोटी लागणार आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये समुपदेशक शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.