शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:35 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरु केली. मात्र ही शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अडचण जात आहे. तर शिष्यवृत्तीसाठी अनेकजण जि. प. मध्ये व बँकेमध्ये चकरा मारत आहेत. त्यामुळे प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.

ठळक मुद्देसुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरु केली. मात्र ही शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अडचण जात आहे. तर शिष्यवृत्तीसाठी अनेकजण जि. प. मध्ये व बँकेमध्ये चकरा मारत आहेत. त्यामुळे प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.२१ व्या शतकातही ग्रामीण भागातील आदिवासींचे शिक्षणाचे प्रमाण आहे. त्यामुळे आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सूवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना २०११ च्या जवळपास या योजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेतर्फे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक हजार, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दीड हजार रुपये, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.सदर योजनेसाठी अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांकडे संपूर्ण दस्ताऐवजासमवेत अर्ज सादर केलेत. अर्ज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. पूर्वी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शाळेच्या खात्यामध्ये जमा होत होती. मुख्याध्यापक ती विद्यार्थ्यांना देत असे. मात्र २०१५ रोजी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी बँकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले. योजनेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी रक्कम खर्च करुन अनेकांनी तालुकास्थळी जाऊन बँकेत खाते उघडले. मात्र अद्यापही त्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा झाली नाही.सन २०१५-१६ या सत्रात मोजक्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. २०१६, २०१७, आणि २०१७- २०१८ या सत्रातही अशीच स्थिती आहे. शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालक, विद्यार्थी आणि संबधीत शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्य चकरा मारत आहेत. शाळेतील मुख्यध्यापक बँकेकडे जाण्यास सांगतात. तर बँक अधिकारी अजूनही पैसे आले नाही, असे सांगून परत पाठवतात.माध्यमिक शिष्यवृत्तीत अडचणविद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य व्हावे, या उद्देशाने शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र सन २०१६-२०१७ ते २०१७-२०१८ या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृती अजूनही प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना अडचण जात असून शिष्यवृत्ती देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.