शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:35 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरु केली. मात्र ही शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अडचण जात आहे. तर शिष्यवृत्तीसाठी अनेकजण जि. प. मध्ये व बँकेमध्ये चकरा मारत आहेत. त्यामुळे प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.

ठळक मुद्देसुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरु केली. मात्र ही शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अडचण जात आहे. तर शिष्यवृत्तीसाठी अनेकजण जि. प. मध्ये व बँकेमध्ये चकरा मारत आहेत. त्यामुळे प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.२१ व्या शतकातही ग्रामीण भागातील आदिवासींचे शिक्षणाचे प्रमाण आहे. त्यामुळे आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सूवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना २०११ च्या जवळपास या योजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेतर्फे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक हजार, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दीड हजार रुपये, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.सदर योजनेसाठी अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांकडे संपूर्ण दस्ताऐवजासमवेत अर्ज सादर केलेत. अर्ज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. पूर्वी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शाळेच्या खात्यामध्ये जमा होत होती. मुख्याध्यापक ती विद्यार्थ्यांना देत असे. मात्र २०१५ रोजी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी बँकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले. योजनेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी रक्कम खर्च करुन अनेकांनी तालुकास्थळी जाऊन बँकेत खाते उघडले. मात्र अद्यापही त्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा झाली नाही.सन २०१५-१६ या सत्रात मोजक्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. २०१६, २०१७, आणि २०१७- २०१८ या सत्रातही अशीच स्थिती आहे. शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालक, विद्यार्थी आणि संबधीत शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्य चकरा मारत आहेत. शाळेतील मुख्यध्यापक बँकेकडे जाण्यास सांगतात. तर बँक अधिकारी अजूनही पैसे आले नाही, असे सांगून परत पाठवतात.माध्यमिक शिष्यवृत्तीत अडचणविद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य व्हावे, या उद्देशाने शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र सन २०१६-२०१७ ते २०१७-२०१८ या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृती अजूनही प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना अडचण जात असून शिष्यवृत्ती देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.