शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

By admin | Updated: September 20, 2016 00:44 IST

बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी ...

शैक्षणिक नुकसान : दुसऱ्यांदा बस रोखलीगोवरी : बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी सोमवारी दुसऱ्यांदा राजुरा आगाराच्या एसटी बसची वाट अडविली व अतिरिक्त बस देण्याची मागणी केली. जोपर्यंत अतिरिक्त बस मिळणार नाही, तोपर्यंत बससमोरुन कोणीही हलणार नाही, असा पवित्रा विद्यार्थी व गावकऱ्यांनी घेतल्याने आधीच बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. गोवरी येथील बसस्थानकावर अतिरिक्त बसच्या मागणीसाठी दोन्ही बाजुकडील वाहतूक विद्यार्थी व गावकऱ्यांनी रोखून धरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासन कोट्यवधी रुपयाचा खर्च करते. मात्र तिच योजना निट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही तर त्या योजनेचे सार्थक होत नाही. अशीच स्थिती सध्या गोवरी, चिंचोली, माथरा, पोवनी येथील विद्यार्थ्यांची झाली आहे. राजुरा येथे शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे जातात. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज प्रवास करावा लागत असल्याने राजुरा आगाराने बस पासची सोय उपलब्ध करून दिली. मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बस आहे. परंतु त्या बसमध्ये विद्यार्थ्यांऐवजी प्रवासी बसून राहत असल्याने समोरील बसस्टॉप वरील विद्यार्थ्यांना बसायाला जागा मिळत नाही. राजुरा-गोवरी-मार्डा हा ग्रामीण भागातील प्रवासासाठी लांबचा टप्पा आहे. एकदा बस सुटली की पुन्हा मिळत नाही. या उद्देशाने प्रवासीही बसमध्ये दाटी करतात. त्यामुळे बस पास असूनही विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षकि नुकसान लक्षात घेता गोवरीचे सरपंच सुनील उरकुडे यांनी वारंवार राजुरा आगार व्यवस्थापकाकडे अतिरिक्त बस देण्याची मागणी केली. पंधरा दिवसांपूर्वी बससाठी शालेय विद्यार्थ्यांनी असाच हंगाम केला होता. तेव्हा आठ दिवसात दुसरी अतिरिक्त बस देण्यात येईल, असे सांगण्यात आले व वेळ मारुन नेली. मात्र १५-२० दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही बस मिळण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने सोमवारी सकाळी गोवरीचे सरपंच सुनील उरकुडे, तंटामुक्त अध्यक्ष गोपीनाथ जमदाडे यांचे नेतृत्त्वात गावकरी व विद्यार्थ्यांनी अतिरिक्त बसची मागणी करीत तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत दुसरी अतिरिक्त बस मिळत नाही तोपर्यंत वाहने जाऊ देणार नाही, असा पवित्रा गावकरी व विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्यामुळे अनेकांना तातकळत रस्त्यावरच उभे राहावे लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आजही नाईलजाने घराकडे परतून जावे लागले. दररोज ५० हुन अधिक विद्यार्थ्यांना घरी राहावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. (वार्ताहर)राजुरा-गोवरी- मार्डा या बसमध्ये आधीच प्रवासी बसून राहात असल्याने आम्हा विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. बस पास असूनही बसअभावी आम्हाला नाईलाजाने बसस्टॉप वरुन घराकडे परत जावे लागते. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.- गितांजली पाचभाईविद्यार्थिनी, गोवरी