शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

By admin | Updated: September 20, 2016 00:44 IST

बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी ...

शैक्षणिक नुकसान : दुसऱ्यांदा बस रोखलीगोवरी : बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी सोमवारी दुसऱ्यांदा राजुरा आगाराच्या एसटी बसची वाट अडविली व अतिरिक्त बस देण्याची मागणी केली. जोपर्यंत अतिरिक्त बस मिळणार नाही, तोपर्यंत बससमोरुन कोणीही हलणार नाही, असा पवित्रा विद्यार्थी व गावकऱ्यांनी घेतल्याने आधीच बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. गोवरी येथील बसस्थानकावर अतिरिक्त बसच्या मागणीसाठी दोन्ही बाजुकडील वाहतूक विद्यार्थी व गावकऱ्यांनी रोखून धरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासन कोट्यवधी रुपयाचा खर्च करते. मात्र तिच योजना निट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही तर त्या योजनेचे सार्थक होत नाही. अशीच स्थिती सध्या गोवरी, चिंचोली, माथरा, पोवनी येथील विद्यार्थ्यांची झाली आहे. राजुरा येथे शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे जातात. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज प्रवास करावा लागत असल्याने राजुरा आगाराने बस पासची सोय उपलब्ध करून दिली. मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बस आहे. परंतु त्या बसमध्ये विद्यार्थ्यांऐवजी प्रवासी बसून राहत असल्याने समोरील बसस्टॉप वरील विद्यार्थ्यांना बसायाला जागा मिळत नाही. राजुरा-गोवरी-मार्डा हा ग्रामीण भागातील प्रवासासाठी लांबचा टप्पा आहे. एकदा बस सुटली की पुन्हा मिळत नाही. या उद्देशाने प्रवासीही बसमध्ये दाटी करतात. त्यामुळे बस पास असूनही विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षकि नुकसान लक्षात घेता गोवरीचे सरपंच सुनील उरकुडे यांनी वारंवार राजुरा आगार व्यवस्थापकाकडे अतिरिक्त बस देण्याची मागणी केली. पंधरा दिवसांपूर्वी बससाठी शालेय विद्यार्थ्यांनी असाच हंगाम केला होता. तेव्हा आठ दिवसात दुसरी अतिरिक्त बस देण्यात येईल, असे सांगण्यात आले व वेळ मारुन नेली. मात्र १५-२० दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही बस मिळण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने सोमवारी सकाळी गोवरीचे सरपंच सुनील उरकुडे, तंटामुक्त अध्यक्ष गोपीनाथ जमदाडे यांचे नेतृत्त्वात गावकरी व विद्यार्थ्यांनी अतिरिक्त बसची मागणी करीत तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत दुसरी अतिरिक्त बस मिळत नाही तोपर्यंत वाहने जाऊ देणार नाही, असा पवित्रा गावकरी व विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्यामुळे अनेकांना तातकळत रस्त्यावरच उभे राहावे लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आजही नाईलजाने घराकडे परतून जावे लागले. दररोज ५० हुन अधिक विद्यार्थ्यांना घरी राहावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. (वार्ताहर)राजुरा-गोवरी- मार्डा या बसमध्ये आधीच प्रवासी बसून राहात असल्याने आम्हा विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. बस पास असूनही बसअभावी आम्हाला नाईलाजाने बसस्टॉप वरुन घराकडे परत जावे लागते. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.- गितांजली पाचभाईविद्यार्थिनी, गोवरी